________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
बाकी, चूक दाखवतो तोच खरा. कितीतरी चुका आहेत ? जो कोणी आपली एक चूक सुधारतो, जो आपली सर्वात मोठी चूक सुधारुन देतो, त्याला भगवंत म्हणतात.
४३
हा तर पूर्वीचा अभ्यास असतो की मी सर्वांमध्ये परमेश्वर पाहतो, पण भांडताना तर परमेश्वर वगैरे सर्व विसरुन जातो आणि भांडत बसतो, की दूध का सांडले ? स्वतःचे मूल काय मुद्दाम दूध सांडेल ?
हे तर आदि-अनादिपासून चालत आलेले, बापाने मुलाला रागावले पाहिजे अशी रीत आहे. यास काय माणुसकी म्हणतात ? मानवतेचा तर कसा सुगंध दरवळतो? पंचवीस पंचवीस मैलापर्यंत सुगंध दरवळतो. स्वत:च्या सर्व चुका दिसू लागल्या तेव्हा समजावे की आत्ता काही भलं होईल. लोकांना स्वत:ची एक सुद्धा चूक दिसत नाही.
हे आहे चुकांचे स्वरुप
अहंकार विलय झाल्यानंतर चूक संपते. अहंकाराचा विलय आपोआप होणार नाही, तो काही चटणी वाटण्यासारखा नाही. अहंकार तर, जेवढ्या चुका दिसतील, तेवढ्या प्रमाणात जातो. अहंकार म्हणजे चुकांचे स्वरुप. इगोईजम हे चुकांचेच स्ट्रक्चर आहे. स्वरुपाचे भान नाही असे म्हटले जाते, अर्थात ते भान विसरलेले आहेत. भान विसरलेल्यांमध्ये संपूर्ण अहंकारानेच भान विसरलेले आहे. मग आत त्याच्याकडे काय सामान आहे तर आत लहान-मोठ्या चुका आहेत ! त्या चुका संपतील तेव्हा काम होईल. निष्पक्षपाती व्हाल तर स्वत:च्या चुका दिसतील.
आत तर सर्व शास्त्रांची वाणी भरलेलीच आहे. चुका संपवेल त्यानंतर वाणी निघेल, आणि ती वाणी पुन्हा निष्पक्षपाती असायला हवी. मुसलमान बसलेला असेल त्यालाही ऐकण्याची इच्छा होते, जैन बसला असेल त्यालाही एकण्याची इच्छा होते. सर्व स्टँडर्डच्या लोकांना ऐकण्याची इच्छा होते, त्यास निष्पक्षपाती वाणी म्हटली जाते.