________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
कॅश-रोकडे प्रतिक्रमण करुन घ्यावे. आपल्यामुळे कोणाला अतिक्रमण झाले तर आपण ते जमा करुन घ्यावे आणि मागे उधारी ठेवू नये. आणि जर कोणामुळे आपले अतिक्रमण झाले तर आपण आलोचना, प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान करुन घ्यावे.
चूक संपवतो तो परमात्मा ज्याने एकदा नक्की केले की माझ्यात ज्या चुका शिल्लक राहिल्या आहेत त्या मला संपवायच्या आहेत, तर तो परमात्मा होऊ शकतो. आपण आपल्या चुकांमुळे बंनधनात अडकलो आहोत. चूक संपवली म्हणजे आपण परमात्माच आहोत. ज्याच्यात एकही चूक उरली नाही तो स्वतः परमात्माच आहे. ती चूक काय सांगते? की, 'तू मला ओळख, मला जाणून घे.' हे तर असे आहे की चुकांनाच स्वत:चे चांगले गुण मानत होतो. चुकांचा स्वभाव कसा आहे की, त्या आपल्यावर नियंत्रण करतात पण चुकीला चूक मानले तर ती पळून जाते. मग ती थांबत नाही. निघूच लागते. पण हे तर काय करतात की त्या चुकीला चूक आहे असे जाणत नाहीत, उलट तिचे रक्षण करतात. म्हणजे चुकांना घरातच जेवू घालतात.
दिला आधार चुकांना, रक्षण करुन प्रश्नकर्ता : दादा, चुकांचे रक्षण कशाप्रकारे केले जाते?
दादाश्री : आपण कुणावर रागावल्यानंतर म्हटले की, 'आपण त्याला रागावलो नसतो तर त्याला समजलेच नसते, म्हणून त्याला रागावलेच पाहिजे,' यामुळे ती 'चूक' असे समजते की या भाऊला अजून माझी ओळख पटली नाही. हा तर उलट माझीच बाजू घेतो. म्हणून इथेच खा, प्या आणि राहा. एकदाच जरी आपण चुकांचे रक्षण केले तर त्या चुकांचे वीस वर्ष आयुष्य वाढते. कोणत्याही चुकांचे रक्षण करु नये.
चावी चुकांना संपविण्याची मन-वचन-कायेने प्रत्यक्ष दादा भगवानांच्या साक्षीने सतत क्षमा