________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
मी उपकार मानतो. हे जग प्रतिध्वनी स्वरुप आहे, याची मी शंभर टक्के गॅरंटी लिहून देतो. म्हणून आम्ही सुद्धा उपकार मानतो तेव्हा तुम्ही सुद्धा उपकार मानले पाहिजेत ना! आणि त्यामुळे तुमचे मन पण खूप चांगले राहील. कारण 'चोर म्हणत आहे' तरीही त्याचे उपकार मानता. नाहीतर तुम्हाला सहज असे वाटेल की, दादांना असे बोलतो?! महावीरांसाठी इतके वाईट शब्द बोलत होते तरीही लोकांनी ते पचवले. त्यांच्या भक्तांनी, सर्वांनी ते शब्द पचवले. जे काही बोलत होते ते सर्व पचवून घेत होते. भगवंतांनी त्यांना तसे शिकवले होते.
ही भानगड उभी करणारा तूच प्रश्नकर्ता : म्हणजे जग निर्दोष आहे हे समजण्याची दृष्टी आता विकसित करावी लागेल ना?
दादाश्री : जर या विहिरीत आपण काही बोललोच नसतो तर काही झंझट झालीच नसती ना! आणि नंतर आपण समोरच्या व्यक्तीचा दोष काढतो की, 'तू मला असे का बोललास?' भानगडीची सुरुवात आपणच केली आणि मग त्याला विचारतो की तू आम्हाला अशा शिव्या का देतोस? त्यावर कोणी म्हणेल, 'अरे, त्याने तुला शिवी दिली पण तू असे बोल ना की, 'तू राजा आहेस." तेव्हा तोही असे बोलेल की 'तू राजा आहेस,' बस. हे सर्व आपलेच प्रॉजेक्शन आहे.
अरे, घे बोधपाठ यापासून लोक मला विचारतात की, तुम्हाला तुमचे दोष सांगण्याची काय गरज आहे ? त्यात काय फायदा? मी म्हणालो, 'तुम्हाला बोध देण्यासाठी की जेणेकरुन तुम्हाला अशी हिंमत यावी. मी बोलू शकतो तर तुम्हाला हिंमत का येऊ नये? नेहमीच, जे दोष होतात ना, ते दुसऱ्यांसमोर उघड केल्याने मन पकडले जाते. मग मन घाबरुन राहते की हे तर उघड करुन टाकतील, उघड करुन टाकतील. मन उलट आपल्यापासून घाबरत राहील