________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
आहे, हे चुकीचे आहे, हे चुकीचे आहे. निरंतर असे वाटले पाहिजे. आणि रोजच 'हे चुकीचे आहे' असे बोलतो पण एखाद्या दिवशी कोणी म्हटले की, 'पत्ते खेळणे ही खूप वाईट सवय आहे.' तेव्हा जर तुम्ही म्हणालात की, 'नाही, चांगली गोष्ट आहे. ' तर मग पुन्हा बिघडेल. त्यावेळी तर तुम्ही असे म्हटले पाहिजे की, खरोखर ही चुकीची गोष्ट आहे. म्हणजे त्यांना जेव्हा उद्युक्त करतात, तेव्हा ( ती सवय) जिवंत ठेवतात हे लोक ! लोक म्हणतात ना, की 'आमच्या सवयी का सुटत नाहीत ?' पण जिवंत ठेवतातच कशाला? पुन्हा पाणी पाजायचेच नाही ना. (चुकांचे रक्षण करु नये, त्यांचा पक्ष घेऊ नये) लोक तर उलट- --सुलट बोलतील. तुम्हाला समजले ना? असे घडते की नाही ?
प्रश्नकर्ता : हो, घडते ना.
दादाश्री : म्हणून ते जिवंत राहीले आहे.
माझ्यासोबतही असे घडले होते. म्हणून मी शोध लावला. या सर्व वस्तू असतात पण तरी आतून त्यासाठी वेगळे राहणे. हुक्का पित होतो तरीही आतून वेगळे, चहा पित होतो, तरीही आत वेगळे. लाचार बनवणाऱ्या वस्तू आपल्याजवळ नसाव्यात. जरी लाचार झालो, तरी आता त्यातून कसे सुटावे, याचा उपाय जाणून घेतला पाहिजे. उपाय जाणून घेतला तेव्हापासून आपण वेगळेच आहोत. म्हणजे काही काळानंतर सोडायचेच आहे, सुटूनच जाणार आहे. आपोआप सुटले तरच खऱ्या अर्थाने सुटले असे म्हणता येईल. अहंकार करुन सोडलेले कच्चे राहते, ते पुढील जन्मात पुन्हा येते. त्यापेक्षा समजून सोडलेले चांगले.
२५
मग ज्याला ज्या वस्तूची सवय असेल, फर्स्टक्लास पत्ते खेळायचे पण मनात मात्र असेच वाटले पाहिजे की, हे पत्ते खेळणे चुकीचे आहे, असे नसावे, असे नसावे, असे नसावे. मग हजार माणसांसमोर आपण उपदेश देत असू आणि त्यावेळी कोणी येऊन म्हणाला की, 'आता काय, पत्ते तर सुटत नाहीत आणि उगाचच दुसऱ्यांना उपदेश देत राहतात ? ! '