________________
३०
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
आम्ही कुणाचा दोष काढत नाही, पण नोंद घेतो की पाहा, हे जग कसे आहे ? सर्व प्रकारे या जगाला मी पाहिले, खूप प्रकारे पाहिले आहे. कोणी दोषी दिसतो ती अजून आपलीच चूक आहे. कधी ना कधी तर निर्दोष पाहावेच लागेल ना? आपल्या हिशोबानुसारच आहे हे सर्व. इतकेच जरी तुम्हाला समजले ना तरीही ते खूप उपयोगी पडेल.
मला हे जग निर्दोष दिसते. तुमची अशी दृष्टी होईल तेव्हा हे कोडे सुटेल. मी तुम्हाला असा प्रकाश (ज्ञान) देईल आणि इतके पाप धुऊन टाकीन की, ज्यामुळे मग तुमच्याजवळ प्रकाश राहील आणि तुम्हाला (हे जग) निर्दोष दिसत जाईल. आणि त्यासोबत पाच आज्ञा पण देऊ. या पाच आज्ञेत तुम्ही राहाल तर तुम्हाला जे ज्ञान दिले आहे, त्यास जरासुद्धा फॅक्चर होऊ देणार नाही.
तेव्हापासून झाले समकित स्वत:चे दोष दिसतील तेव्हापासून समकित झाले असे म्हटले जाते. स्वतःचे दोष दिसतील तेव्हा समजावे की स्वतः जागृत झालो आहोत. नाही तर सर्व झोपेतच चालले आहे. दोष नष्ट झाले की नाही, याची जास्त काळजी करण्यासारखी नाही पण जागृतीचीच मुख्य गरज आहे. जागृती आल्यानंतर नवीन दोष होत नाहीत आणि जे जुने दोष असतील ते निघत राहतील. आपण त्या दोषांना बघायचे की कशाप्रकारे हे दोष होत आहेत !
जितके दोष दिसतील तितके दोष निरोप घेऊ लागतील.जे जास्त चिकट दोष आहेत ते दोन दिवस, तीन दिवस, पाच दिवस, महिना किंवा वर्षभरानंतर पण दिसले म्हणजे ते निघूच लागतात. अरे, पळूच लागतात. घरात चोर घुसला असेल तर तो किती दिवस लपून बसेल? मालकाला माहीत नाही तोपर्यंत. मालकाला समजताच चोर लगेच पळ काढतो.
शेवटी तर ते प्राकृत गुण प्रश्नकर्ता : दादा, आम्हाला कुणाचे दोष बघायचे नाही फक्त गुणच बघायचे?