________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
कोणी शिव्या देणारा भेटला नव्हता ना! मग विकत कुठून आणणार आपण? आणि विकत देणारही कोण? आपण समोरुन त्याला म्हणालो की, 'तू मला शिवी दे.' तरीही तो म्हणेल की 'नाही, तुम्हाला शिवी नाही देऊ शकत.' म्हणजे पैसे देऊनही कोणी शिवी देत नव्हता. म्हणून मग मला स्वतःलाच शिव्या द्याव्या लागत होत्या, 'तुम्हाला अक्कल नाही, तुम्ही मूर्ख आहात, गाढव आहात, असे आहात, तसे आहात, मोक्षधर्म काही कठीण आहे की, तुम्ही एवढा धुमाकूळ घालून ठेवलाय?' अशा शिव्या स्वतःच देत होतो. दुसरा कोणी शिव्या देणारा नसेल मग काय करणार? तुम्हाला तर घर बसल्या शिव्या देणारा भेटतो, फ्री ऑफ कॉस्ट भेटतो, तेव्हा त्याचा फायदा करुन घ्यायला नको का?
लुटारु सुद्धा दूर राहतात, शीलवंतांपासून शीलचा प्रभाव असा आहे की जगात कोणी त्याचे नाव घेऊ शकत नाही. लुटारुंच्या जवळपास राहत असेल, पाचही बोटात सोन्याच्या अंगठ्या घातल्या असतील, शरीरभर सोन्याचे दागिने घातले असतील आणि जर समोर लुटारु भेटले. तर लुटारु त्याला पाहतात खरे पण हात लावू शकत नाहीत, स्पर्श करु शकत नाही. अजिबात घाबरण्यासारखे हे जग नाही. जी काही भीती आहे ती तुमच्याच चुकांचे फळ आहे, हे सांगण्यासाठी आम्ही आलो आहोत. लोक असेच समजतात की, हे जग बेकायदेशीर आहे.
प्रश्नकर्ता : समजूतीचीच कमतरता !
दादाश्री : समजूतीच्या कमरतरतेमुळेच हे जग टिकून राहीले आहे. आम्ही हेच सांगू इच्छितो की, जगात भीती बाळगण्याची गरजच नाही. ही जी भीती वाटते, तो तुमचा हिशोब आहे. हिशोब चुकता होऊ द्या. इथे पुन्हा नव्याने उधारी करु नका.
तुमच्याशी कोणी वाईट बोलला, तर तुम्हाला वाटते की, हा मला वाईट का बोलतो? मग तुम्ही सुद्धा त्याला पाच शिव्या घालता. म्हणजे