________________
स्थिर होते! मगच आतील हुल्लड शांत होतो! अन्यथा विचारांचे काहूर चालूच राहते. अशा प्रकारे जगात ढवळाढवळ होत राहिली आहे.
अशी सूक्ष्म गोष्ट कोणत्या शास्त्रात सापडेल? जगाचे सार कुठल्याही शास्त्रात शोधून सापडणार नाही, ते तर ज्ञानींकडूनच समजते.
समोरील व्यक्तीचे दोष दिसतात, हीच संसाराची अधिकरण क्रिया आहे! मोक्षाला जाणारा स्वत:च्याच चुका पाहत राहतो आणि संसारात भटकणारा दुसऱ्यांच्याच चुका पाहत राहतो!
अभिप्राय ठेवल्याने दृष्टी दोषित होऊन जाते. प्रतिक्रमणाने अभिप्राय तुटतात आणि नवीन मन तयार होत नाही.
आत्मदृष्टी झाल्यानंतर... देहाध्यास सुटतो आणि आत्म्याचा अध्यास बसतो त्यानंतर मग निजदोषच (स्वतःचेच दोष) दिसतात.
कित्येक दोष बर्फासारखे गोठलेले असतात, ते पटकन कसे जातील? अनेक थरवाले (आवरणवाले) दोष असतात म्हणून ते हळूहळू जातात. जसजसे दोष दिसू लागतात तसतसे थर कमी होत जातात. कांद्याच्या पाकळया असतात ना त्याचप्रमाणे. जास्त चिकट दोषांचे जास्त प्रतिक्रमण करावे लागतात.
'चंदुभाऊ' कडून दोष होतो आणि ते जर त्याला आवडत नसेल तर त्यास 'दोष पाहिला' असे म्हटले जाते आणि जे दोष दिसतात ते जातात.
जीवन हे स्वत:च्याच पाप-पुण्याच्या गुन्हेगारीचा परिणाम आहे. आपल्यावर फुलांचा वर्षाव होतो तो पुण्याचा परिणाम आणि दगड पडतात तो पापाचा परिणाम आहे! किंमत आहे समताभावे भोगून घेण्याची.
जास्त करुन समस्या वाणीमुळे निर्माण होतात. तिथे जागृती ठेवून
१६