________________
देतो की मला तुझी ही चूक दिसत आहे. तुला गरज वाटत असेल तर स्वीकार, नाहीतर बाजूला ठेव. प्रथम घरातील सर्व आणि शेवटी बाहेरील सर्वच निर्दोष दिसू लागतील तेव्हा समजावे की आता आपण मुक्तीच्या पायऱ्या चढलो.
दुसऱ्यांचे नाही पण स्वत:चेच दोष दिसू लागले तेव्हा समकित झाले म्हणून समजावे! आणि जेवढे दोष दिसतात ते निरोप घेतात, कायमसाठी!
समोरच्याचे गुण किंवा अवगुण दोन्हीही पाहू नयेत! शेवटी दोन्हीही प्राकृत गुणच आहेत ना! विनाशीच आहेत ना! त्यांच्यात शुद्धात्माच पाहावा.
परम पूज्य दादाश्री सांगतात की, 'खिसेकापू असो की चारित्र्यहीन असो, त्यालाही आम्ही निर्दोषच पाहतो! आम्ही सत् वस्तूलाच पाहतो. ही तात्विक दृष्टी आहे. आम्ही पॅकिंगला पाहत नाही!' जगाला निर्दोष पाहण्याची ही एक मात्र ‘मास्टर की' (गुरुकिल्ली) आहे !
स्वतःच्या चुका केव्हा समजतात? ज्ञानी पुरुष दाखवतात तेव्हा. ज्ञानी पुरुष शिरोमान्य नसतील तर सर्व स्वच्छंदच म्हटले जाते.
उजेडातील चुकांचा तर केव्हा ना केव्हा अंत येईल पण अंधारातील चुका जातच नाहीत ना! अंधारातील चुका म्हणजे 'मी जाणतो!!!'
अक्रम ज्ञानाच्या प्राप्तीनंतर फक्त आतलेच बघितले गेले तर तुम्ही 'केवळज्ञान' सत्तेत असाल. अंश केवळज्ञान होते, सर्वांश नाही. आत मन-बुद्धी-चित्त-अहंकाराला पाहत राहावे. पर सत्तेतील पर्यायांना पाहत राहावे.
'वस्तू, वस्तूचा स्वभाव चुकते त्यास प्रमत्त म्हणतात. वस्तू त्याच्या मूळ धर्मात राहते ते अप्रमत्त भाव.'
मोक्ष केव्हा होतो? 'तुझे ज्ञान आणि तुझी समज चूक रहित होते
१४