________________
आदर्श शिक्षणप्रणालीची ही भारतीय ठेवण
कालौघात गेले सारे बदलून
शिक्षणाचे झाले पाश्चात्यीकरण
शिक्षण फक्त अर्थकारण ||४||
दीक्षा गुरुकुलवासात
जेव्हा होते ब्रह्मचर्याचे शिथिलीकरण अहो ! कुशील ठरले पार्श्वस्थ श्रमण
महावीरांनी मुनीस केले सतत सावधान संपूर्ण ग्रंथात सांगितले पुन्हा पुन्हा स्त्रीवर्जन
ब्रह्मचर्य व ज्ञानग्रहण
यातील संबंधाचे विज्ञान
जाणती महावीर भगवान ।।५।।
(क) सामायिक
त्रस स्थावर जीवनिकाय
राहिले विश्व व्यापून
सुखदुःख समान चेतन
सर्व आत्मवत् मानून
करतो षट्जीवांचे यतन
आणि समतेचे पालन ||१||
सर्वांना देतो अभयदान
राहतो निर्भय होऊन
१२२