________________
निवांत। स्वप्नी वटेश्वर देखिला निवांत.' जिवींचे हितगुजज्ञान कोणी सांगितलें तर चांगदेव वर्णन करितात 'चांगा म्हणे जिवींचे गुज, वटेश्वरें मज सांगितले'. (अभंग ३४) शेवटी शेवटी अभंग ४५ मध्ये तर स्पष्टच उल्लेख आहे की 'चांगा सोय धरो ज्ञान-वटेश्वरों। मुक्ताई जिव्हारी बोध करी।' या सर्व अभंगांतून वटेश्वरावा योगमार्गाशों कोठेही संबंध चांगदेवाने सांगितलेला नाही. तेव्हां चांगदेवांच्या या प्रत्यक्ष उल्लेखाविरुद्ध नुसत्या दंतकथांवर उभारलेले वटेश्वराचे योगमार्ग-संबंध प्रमाणभत मानतां येत नाहीत.
___ मग हा वटेश्वर होता तरी कोण? ज्ञानदेवांची भेट होईपर्यंत चांगदेव कोराच होता. अनेक सिद्धोंनी युक्त असून चांगदेवाचें कोरेपण, ईश्वराशी प्रत्यक्ष भेट होत असतांही नामदेवाच्या कच्चेपणासारखेच होते. हे कोरेंपण घालविण्यासाठी ज्ञानराजांनी चांगदेवास चांगदेव पासष्टी लिहून पाठविली. पण तिचा अर्थ त्यास कळेना. तेव्हां श्री. मुक्ताबाईंनी चांगदेवास विश्रांति-वटाखाली त्या चांगदेव पासष्टीचा अर्थ सांगितला व चांगदेवास ईश्वरस्वरूप करून दिले. या दंतकथेवरून वटाखाली दाखविलेल्या स्वतःचे ईश्वरस्वरूपाशी एकजीव झालेला चांगदेव तर पुढे वट +ईश्वर=वटेश्वर या नांवाने ओळखिला जात नसेल ना? म्हणजे मळचा चांगदेव वटाखालों ईश्वर झाल्यामुळे चांगावटेश्वर झाला असावा. वटेश्वर म्हणजे दुसरें कोणी नसून चांगदेवाच्या अंतर्यामी प्रकाशणारें ईश्वर स्वरूप. या कयनेस मान्यता दिली म्हणजे सारी कोडी उलगडतात. 'गुरूनुं शिष्याचा घोंटु भरून', 'तंव शिष्य मुखों प्रवेशला', 'गुरु शिष्य एक झाले तें झालें पणहि गेले, गेले पण राहिलें, वटेश्वरि' इत्यादि तत्वसारांतील वाक्यांचा, बोध स्पष्ट होतो. अभंगांतली अनेक स्थळे उलगडतात. उदाहरणार्थ मागें उल्लेखिलेला चरण आतां अधिक स्पष्ट समजतो. 'चांगया सोय धरी ज्ञान वटेश्वरी' ही मुक्ताबाईची भाषा ज्ञानरूप वटेश्वर मानला तर अधिक समर्पक होईल. अभंग २२ मध्ये 'मुक्ताई म्हणे नांव पै ठेवीन, सुता बोलवीन वटेश्वरा,' याचा अर्थ या कल्पनेनुरूप जास्त चांगला लागतो. शिवाय ४६ अभंगांपैकी ५ अभंगांत चांगदेव हे नांव मुळीच नसून नुसते वटेश्वर हेच नांव आहे. तत्कालीन कवींच्या Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com