________________
आत्यंतिक कल्याणार्थी उपयोगी सिद्ध होणार.
ज्ञानी पुरुषांची वाणी द्रव्य-क्षेत्र - काळ - भाव तसेच भिन्न भिन्न निमित्तांच्या आधीन निघालेली आहे, त्या वाणीच्या संकलन मध्ये भासीत क्षतिंना क्षम्य मानून ज्ञानी पुरुषाची वाणीचा आंतर आशय प्राप्त करून घ्यावा हीच अभ्यर्थना!
ज्ञानी पुरुषाची जी वाणी निघाली आहे, ती नैमित्तिकरूपे जे मुमुक्षुमहात्मा समोर आलेत त्यांच्या समाधानासाठी निघालेली असते आणि ती वाणी जेव्हा ग्रंथरूपी संकलित होते तेव्हा कधी काही विरोधाभास वाटेल. जसे की एक प्रश्नकर्ताची आंतरिक दशाच्या समाधानासाठी ज्ञानीपुरुषाचे ‘प्रतिक्रमण हे जागृति आहे आणि अतिक्रमण हे डिस्चार्ज आहे.' असे प्रत्युत्तर प्राप्त झाले. आणि सूक्ष्म जागृतिच्या दशापर्यंत पोहचलेल्या महात्मांना सूक्ष्मता मध्ये समजण्यासाठी ज्ञानी पुरुष असा खुलासा करतात की, 'अतिक्रमण हे डिस्चार्ज आहे आणि प्रतिक्रमण हे पण डिस्चार्ज आहे. डिस्चार्जला डिस्चार्जने तोडायचे आहे. ' तर दोन्ही खुलासा नैमित्तिकरूपे यथार्थच आहे परंतु सापेक्षरूपे विरोधाभास वाटते. असे प्रश्नकर्ताच्या दशामध्ये फरक असल्यामुळे प्रत्युत्तरमध्ये विरोधाभास वाटते तरी सुद्धा सैद्धांतिक रूपे त्याच्यात विरोधाभास नाहीच आहे. सुज्ञ वाचकांना ज्ञानवाणीची सूक्ष्मता आत्मसात होण्यासाठी ही गोष्ट समजावी म्हणून साहिजक रूपाने हे सूचित केले जात आहे.
- डॉ. नीरूबेन अमीन ह्यांचे जय सच्चिदानंद
—
टीप : या पुस्तक मध्ये स्वरूपज्ञान न प्राप्त झालेल्यांचे प्रश्न मुमुक्षुच्या रूपे विचारले गेले आहेत, त्या पूर्ण शिर्षकाखाली केलेले स्पष्टीकरण त्याचेच समजायचे. त्याचे व्यतिरिक्त प्रश्नकर्ताच्या रूपे विचारणारे अक्रममार्गचे स्वरूपज्ञान प्राप्त झालेल्यांचे आहेत, असे सुज्ञ वाचकांनी समजायचे. जेथे जेथे चंदुभाई नांवाचा प्रयोग केला गेला आहे, तेथे तेथे सुज्ञ वाचकांनी स्वत:ला समजायचे.
11