Book Title: Pratikraman
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 80
________________ प्रतिक्रमण नुकसान आहे? माफी मागून घ्या आणि पुन्हा नाही करणार असे भाव पण ठेवायचे. बस एवढेच, थोडक्यात करून टाकावे. याच्यात भगवान काय करणार? त्याच्यात कुठे न्याय पहायचा असतो ? व्यवहारला जर व्यवहार समजलात तर न्याय समजून गेलात! शेजारी उलटे का बोलून गेला? कारण की, आपला व्यवहार तसा होता म्हणून. आणि आपल्याकडून वाणी उलट निघाली तर ती समोरच्याचे व्यवहाराधीन आहे. परंतु आपल्याला तर मोक्षाला जायचे आहे त्यासाठी प्रतिक्रमण करून घ्यायचे. ६७ प्रश्नकर्ता : समोरचा उलटे बोलतो त्यावेळी आपल्या ज्ञानाने समाधान राहतो. परंतु मुख्य प्रश्न हा आहे की, आमच्याकडून कटूता निघत असते. तर त्यावेळी आम्ही त्या वाक्याचा आधार घेतो, तर आम्हाला उलटे लाइसन्स मिळून जाते. दादाश्री : त्या वाक्याचा आधार घ्यायचाच नाही ना? त्यावेळी तर तुम्हाला प्रतिक्रमणाचा आधार दिला आहे. समोरच्याला दुःख झाले असे बोलले गेले असेल तर प्रतिक्रमण करून घ्यायचे. आणि समोरचा वाटेल तसा बोलतो, तेव्हा वाणी पर आहे आणि पराधीन आहे, असे स्वीकार केले म्हणजे तुम्हाला समोरच्याचे दुःख रहातच नाही ना? प्रश्नकर्ता : परमार्थच्या कामासाठी थोडे खोटे बोललो तर त्याचा दोष लागणार? दादाश्री : परमार्थ म्हणजे आत्मासाठी जे काही पण केले जाते, त्यात दोष लागत नाही आणि देहासाठी जे काही केले जाते, त्याची जर खोटे करण्यात आले तर दोष लागणार, चांगले करण्यात आले तर फायदेशीर लागणार. आत्म्यासाठी जे काही पण केले जाते त्याची हरकत नाही. हां, आत्महेतु असेल, त्या संबंधी जे जे कार्य असेल त्याच्यात काही दोष नाही, समोरच्याला आपल्या निमित्ते दुःख झाले तर दोष लागतो ! प्रश्नकर्ता : प्रतिक्रमणचा परिणाम नाही झाला तर त्याचे कारण काय, आम्ही पूर्णभावने नाही केले त्यामुळे, की मग समोरच्या व्यक्तिचे आवरण आहेत ?

Loading...

Page Navigation
1 ... 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114