________________
प्रतिक्रमण
९७
प्रतिक्रमण सुद्धा अहंकारानेच करायचे. परंतु चेतावणी कोणाची? प्रज्ञाची. प्रज्ञाशक्ति म्हणत असते, 'अतिक्रमण का केले?' प्रज्ञा काय चेतवते ? 'अतिक्रमण का केले? तर प्रतिक्रमण कर'.
सूक्ष्मातून सूक्ष्म दोष आमच्या दृष्टिबाहेर जात नाही. सूक्ष्मातून सूक्ष्म, अति अति सूक्ष्म दोषाची आम्हाला त्वरितच माहिती होऊन जाते. तुम्हाला कोणालाच माहित नाही पडणार की माझा दोष झाला आहे. कारण की दोष स्थूळ नाहीत..
प्रश्नकर्ता : तुम्हाला आमचे पण दोष दिसतात?
दादाश्री : सगळे दोष दिसतात. परंतु आमची दृष्टि दोष प्रति नसते. आम्हाला ते लगेच माहित होऊन जाते. परंतु आमची तर तुमच्या शुद्धात्मा प्रतिच दृष्टि असते. आमची तुमच्या उदयकर्म प्रति दृष्टि नसते. सगळ्यांच्या दोषांची आम्हाला माहिती पडूनच जाते. दोष दिसतात तरीसुद्धा आमच्या वर त्याचा परिणाम होत नाही.
आमच्याजवळ जेवढे दंड देण्या योग्य आहेत त्यांना सुद्धा माफी असते, आणि माफी सुद्धा सहज असते. समोरच्याला माफी मागावी नाही लागणार. जेथे सहज माफ केले जाते तेथे ते लोक स्वच्छ होत असतात. आणि जेथे असे सांगितले जाते 'साहेब माफ करावे' तेथेच मलीन झालेले आहेत. सहज माफ होते तेथे तर खूपच स्वच्छ होऊन जाते.
जोपर्यंत आम्हाला सहजता असते तोपर्यंत आम्हाला प्रतिक्रमण करायचे नसतात. साहजिकता मध्ये तुम्हाला सुद्धा प्रतिक्रमण नाही करावे लागत. साहजिकता मध्ये फरक पडला की प्रतिक्रमण करावे लागते. तुम्ही आम्हाला जेव्हा पाहणार तेव्हा साहजिकता मध्येच पाहणार, जेव्हा पाहणार तेव्हा आम्ही त्याच स्वभावमध्ये असणार. आमच्या साहजिकतेत फरक नाही पडत.
आम्ही तुम्हाला पाच आज्ञा देतो, कारण की ज्ञान तर दिले, परंतु ते तुम्ही गमवून बसणार. म्हणून ह्या पाच आज्ञा मध्ये राहणार तर मोक्षे जाणार. आणि सहावे काय सांगितले? जेथे अतिक्रमण झाले तेथे प्रतिक्रमण करावे.