________________
प्रतिक्रमण
९५
दादाश्री : ती लांब असली तर, असे मानायचे की ह्या एका माणसा बरोबर शंभर प्रकारचे दोष होऊन गेले असतील तर सगळ्यांचे एकत्र प्रतिक्रमण करून टाकायचे की ह्या सगळ्या दोषांची मी आपल्या जवळ क्षमा मागत आहे!
प्रश्नकर्ता : आता ह्या जीवनाचे नाटक लवकर पुरे झाले तर चांगले. दादाश्री : असे का बोलता?
प्रश्नकर्ता : येथे तुम्ही वीस दिवस होते, परंतु एका ठिकाणीही मी नाही येऊ शकलो.
दादाश्री : म्हणून काय देह पूर्ण करून द्यायला पाहिजे?
ह्या देहाने 'दादा भगवानांना' ओळखले. ह्या देहाचे तर एवढे काही उपकार आहेत की, कोणताही औषधोपचार करावा लागला तरी करायचा. ह्या देहाने तर 'दादाची' ओळख झाली. अनंत देह गमवले, सर्व व्यर्थ गेलेत. ह्या देही ज्ञानींना ओळखले म्हणून हा देह मित्र समान होऊन गेला. आणि हा सेकन्ड (दुसरा) मित्र समजलात ना? तर आता ह्या देहाचे काळजीने जतन करायचे. म्हणून आज ह्याचे प्रतिक्रमण करायचे. 'देह लवकर समाप्त होवो' असे म्हटले त्याची माफी मागत आहे.
२५. प्रतिक्रमणांची सिद्धांतिक समज प्रश्नकर्ता : तन्मयाकार झालो म्हणजे जागृतिपूर्वक पुरेपूर निकाल नाही होत. आता तन्मयाकार होऊन गेल्यानंतर ध्यानात येते, तर मग त्याचा प्रतिक्रमण करून निकाल करण्याचा काही मार्ग आहे का?
दादाश्री : प्रतिक्रमण केले तर हलके होऊन जाते. नंतर पुन्हा येणार ते हल्के होऊन येणार. पण जर प्रतिक्रमण नाही केले तर तेच ओझे पुन्हा येते. नंतर परत सटकून जाते, चार्ज झाल्याबिगरचे अर्थात् प्रतिक्रमणमुळे हलके करून करून मग निराकरण होतो.
प्रश्नकर्ता : आपण म्हणता की अतिक्रमण न्युट्रलच आहे. तर मग प्रतिक्रमण करायचेच कुठे राहिले?