Book Title: Pratikraman
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 107
________________ ९४ प्रतिक्रमण आलोचना करणार? आणि आलोचना केल्याशिवाय सुटका नाही. जोपर्यंत आलोचना नाही करत तर मग त्याला कोण माफ करविणार? ज्ञानी पुरुष पाहिजे ते करून शकतात. कारण की ते कर्ता नसतात म्हणून. जर कर्ता असतील तर त्यांना पण कर्मबंधन होणार. परंतु ते कर्ता नसतात म्हणून पाहिजे ते करू शकतात. तेथे आम्हाला आलोचना गुरू जवळ करायला हवी. परंतु अंतिम गुरू हे 'दादा भगवान' म्हटले जातात. आम्ही तर तुम्हाला मार्ग दाखवून दिला. अंतिम गूरू दाखवून दिले. ते तुम्हाला उत्तर देत राहतील आणि म्हणूनच ते 'दादा भगवान' आहेत. जोपर्यंत ते प्रत्यक्ष नाही होत, तोपर्यंत ह्या 'दादा भगवानांना' भजावे लागेल. हे प्रत्यक्ष झाल्यानंतर आपोआप, येता-येता मग मशीन चालू होणार. अर्थात् नंतर ते स्वतः 'दादा भववान' होणार. ज्ञानी पुरुष जवळ झाकून ठेवले म्हणजे संपले. लोक उघडे करण्यासाठी तर प्रतिक्रमण करतात. तो भाऊ सगळे घेवून आला होता ना? तो उलट उघडे करतो ज्ञानी जवळ! तर तेथे कोणी झाकले तर काय होईल ? दोष झाकल्यावर दुप्पट होणार. पत्नि बरोबर जेवढी ओळख आहे तेवढीच ओळख प्रतिक्रमण बरोबर व्हायला पाहिजे. जसे स्त्रीला विसरत नाही तसे प्रतिक्रमण विसरायला नाही पाहिजे. सर्व दिवसभर माफी माग-माग करायचे. माफी मागण्याची सवयच होउन जायला पाहिजे. ही तर दुसऱ्यांचे दोष पाहण्याची दृष्टिच होऊन गेली आहे. ज्यांच्या बरोबर विशेष अतिक्रमण झाले असेल त्यांच्या बरोबर प्रतिक्रमणचा यज्ञ सुरू करून द्यायचा. अतिक्रमण भरपूर केले आहेत. प्रतिक्रमण नाही केलेत त्याचे हे सगळे आहे. हे प्रतिक्रमण तर आमची सूक्ष्मातिसूक्ष्म शोध आहे. जर ह्या शोधला समजलात तर कोणाबरोबर कसलाही झगडा राहणार नाही. प्रश्नकर्ता : दोषांची लिस्ट (यादी) तर खूप लांब होत असते.

Loading...

Page Navigation
1 ... 105 106 107 108 109 110 111 112 113 114