________________
प्रतिक्रमण
औरंगाबादला अनंत अवतारचे दोष धुतले जातील अशी विधि करत असतो. एक तासाच्या प्रतिक्रमण विधि मध्ये तर सगळ्यांचा अहंकार भस्मीभूत होऊन जात असतो! आम्ही औरंगाबाद येथे तर बारा महिन्यामध्ये एक वेळा प्रतिक्रमण करवित होतो. तेव्हा दोनशे-तीनशे माणसे रडत रहायची आणि सगळे रोग निघून जायचे. कारण की तेथे स्त्रीयांना त्यांचे पति पाया पडायचे, माफी मागायचे, किती तरी अवतारचे बंधन झालेल्यांचे ते माफी मागायचे, तेव्हा कितीतरी स्वच्छ होऊन जायचे.
तेथे दरवर्षी, त्यासाठी आम्हाला खूप मोठी विधि करावी लागायची, सगळ्यांचे मन स्वच्छ करण्यासाठी, आत्मा (व्यवहार आत्मा)ची शुद्धि करण्यासाठी, मोठी विधि करून दयायचो. त्यावेळी सगळे शुद्ध होऊन जायचे. कम्प्लीट क्लियर, स्वतःच्या ध्यानात पण नाही राहायचे की मी काय लिहीत आहे, परंतु सगळे स्पष्ट लिहून आणायचे. नंतर 'क्लियर' होऊन गेले. अभेदभाव उत्पन्न झाला ना, एक मिनिट मला सोपून दिले ना की मी असा आहे साहेब, तो अभेदभाव होऊन गेला. एवढी त्याची शक्ति वाढली.
___ आणि नंतर मी तुझ्या दोषांना जाणून त्यादोषांवर विधि करत राहील. हा कलियुग आहे, कलियुगमध्ये कोणते दोष नाही होणार ? कोणाचे दोष काढणे हेच चुकीचे आहे. कलियुगमध्ये दुसऱ्याची चुक काढणे हीच स्वतःची चुक आहे. कोणाची चुक काढायची नाही. गुण काय आहे? हे पाहणे जरूरी आहे. त्याच्या जवळ काय राहिले आहे? शिल्लक काय राहिली आहे हे पाहणे जरूर आहे. ह्या काळात शिल्लकच नाही रहात ना ! शिल्लक राहिली आहे तेच महात्मा उंचावर आहे ना! ।
जे आपल्या जवळ आहे, पूर्वी पण होते आणि आज ही आहे, ते आपले धर्मबंधु म्हणावे आणि स्वत:चा धर्मबंधु बरोबरच जन्म-जन्मांतरांचे वैर बांधलेले असतात. त्यांच्या बरोबर काही वैर बांधलेले असेल तर त्यासाठी आपण समोरासमोर प्रतिक्रमण करून घेतले तर हिशोब चुकता होऊन जातो. एकही माणसाचा समोरासमोर प्रतिक्रमण करायला चुकायचे नाही. सहाध्यायी बरोबरच जास्त वैर बांधले जाते आणि त्याचे प्रत्यक्ष