Book Title: Pratikraman
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 88
________________ प्रतिक्रमण ७५ प्रश्नकर्ता : नाही होणार. दादाश्री : मग काय होणार? प्रश्नकर्ता : तो तर तीन-चार-पांच वेळा उछलणार. दादाश्री : म्हणजे आपल्या हातातून मग नेचरच्या (निर्सगाच्या) हातात गेला. मग नेचर जेव्हा बंद करेल तेव्हा, तर असे हे सर्व आहे. आपल्या ज्या चूका आहेत, त्या नेचरच्या हातात जातात!! प्रश्नकर्ता : नेचरच्या हातात गेल्या तरी पण प्रतिक्रमण केल्याचा काय फायदा होत असतो? दादाश्री : खूप परिणाम होतो. प्रतिक्रमणने समोरच्या माणसावर इतका मोठा परिणाम होत असतो की जर कधी एक तास एका माणसाचे प्रतिक्रमण केले तर त्या माणसामध्ये काही नविन प्रकारचे, खूप जबरदस्त परिवर्तन होते. प्रतिक्रमण करणाऱ्याला हे ज्ञान दिलेले असायला पाहिजे. शुद्ध झालेला, 'मी शुद्धात्मा आहे' असे भानवाला. तर त्याच्या प्रतिक्रमणाने खूप परिणाम होणार. प्रतिक्रमण तर आमचे हत्यार आहे मोठ्यातले मोठे ! 'ज्ञान' घेतलेले नसेल तेव्हा तर प्रकृति पूर्ण दिवस उलटच चालत असते आणि आता तर सुलटच चालत असते. तू समोरच्याला सुनावून दिले, परंतु आतून म्हणतो की, 'नाही, नाही, असे नाही करायचे. सुनावून घ्यायचा आला त्याचे प्रतिक्रमण करा.' आणि ज्ञानच्या पहिले तर सुनावूनच द्यायचा, आणि वरून म्हणायचा की अजून सुनावण्यासारखे होते. मनुष्यचा स्वभाव कसा आहे की जशी प्रकृति तसा स्वतः होऊन जातो. जेव्हा प्रकृति सुधारत नाही तेव्हा म्हणेल मरू दे, 'पिछा सोड'! अरे, बाहेर नाही सुधारली तर काही हरकत नाही, तू स्वत:ला आत सुधार ना ! मग आपली रिस्पोन्सिबिलिटी नाही! इतके मोठे हे 'सायन्स' आहे !!! बाहेर पाहिजे ते होवो त्याची रिस्पोन्सिबिलिटी च नाही. एवढे समजलात तर उलगडा होईल. २२. निकाल, चिकट फाईलींचा बरेचसे लोक मला म्हणत असतात की, 'दादा समभावे निकाल

Loading...

Page Navigation
1 ... 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114