________________
प्रतिक्रमण
चंदुभाईला 'तुम्हाला' एवढेच सांगावे लागते की प्रतिक्रमण करत रहा. तुमच्या घरातील सर्व माणसांबरोबर, तुम्हाला पूर्वी काही ना काही दुःख झाले असेल, त्याचे तुम्हाला प्रतिक्रमण करायचे आहे. संख्यात की असंख्यात जन्मात जे राग-द्वेष, विषय-विकार, कषाय मुळे दोष केले असतील त्याची क्षमा मागत आहे. असे दररोज घरातील प्रत्येक व्यक्तिचे, एकेकाला घेऊन घेऊन करायचे. मग आजूबाजूचे, शेजारी पाजारींचे सगळ्यांना घेवून उपयोगपूर्वक हे करीत राहायला पाहिजे. तुम्ही केल्यानंतर हे ओझे हलके होऊन जाणार. असेच काही हलके होणार नाही. आम्ही सर्व संसार बरोबर असे निवारण केले. प्रथम असे निवारण केले, तेव्हा तर सुटका झाली. जोपर्यंत आमचा दोष तुमच्या मनात आहे, तोपर्यंत आम्हाला चैन पडू देणार नाही ! म्हणून आम्ही जेव्हा असे प्रतिक्रमण करतो तेव्हा त्या तिथे पुसले जाते.
८६
प्रतिक्रमण तर तुम्ही खूपच करत जा. तुमच्या सर्कल मध्ये पन्नासशंभर जेवढी पण माणसे असतील, ज्यांना ज्यांना तुम्ही रगड रगड केले असेल त्या सगळ्यांचे सवड मिळाल्यास तास-तास बसून, एका-एकाला शोधून शोधून प्रतिक्रमण करायचे. जेवढ्यांना रगड रगड केले आहे ते तर धुवावे लागेल ना? नंतर मग ज्ञान प्रगट होणार.
नंतर हा जन्म, मागचे जन्म, मागचे संख्यात जन्म, मागचे असंख्यात जन्मांत, मागचे अनंत जन्मांत दादा भगवानच्या साक्षीत दिगंबरधर्माचे साधु, आचार्यची जे जे अशातना, विराधना केली अथवा करून घेतली असेल तर त्याबद्दल क्षमा मागतो आहे. दादा भगवानच्या साक्षीत क्षमा मागत आहे. किंचित्मात्र अपराध नाही होणार अशी मला शक्ति द्यावी. असे सगळ्या धर्मांचे करायचे.
अरे, त्यावेळी अज्ञानदशेत आमचा अहंकार भारी. 'अमुक असे आहे, तसे आहे', तिरस्कार, तिरस्कार, तिरस्कार, तिरस्कार... आणि कोणाची प्रशंसा ही करायचा. एकाची एकीकडे प्रशंसा करायचा आणि दुसऱ्याचा तिरस्कार करायचा. नंतर मग १९५८ मध्ये ज्ञान झाले तेव्हापासून, ‘ए. एम. पटेलला' सांगितले की, 'हे जे तिरस्कार केलेत, ते धुवून टाका सर्व आता, साबण लावून.' माणसांना शोधून शोधून सर्व धुवून काढले. ह्या बाजूचे