________________
७८
प्रतिक्रमण
स्पंदना शिवाय गेला ! अशा प्रकारे दिवस गेला तर खूप झाले, हाच पुरुषार्थ आहे.
हे ज्ञान मिळाल्यानंतर नविन पर्याय अशुद्ध होत नाही, जुने पर्याय शुद्ध करायचे आणि समतामध्ये रहायचे. समता म्हणचे वीतरागता. नविन पर्याय बिघडत नाही, नविन पर्याय शुद्धच रहातात. जुने पर्याय अशुद्ध झाले असतील, त्यांचे शुद्धिकरण करायचे. आमच्या आज्ञामध्ये राहिल्याने त्यांचे शुद्धिकरण होईल आणि समतामध्ये रहायचे.
प्रश्नकर्ता : दादाजी, ज्ञान घेतल्या आधीचे या जन्माचे जे पर्याय बांधले गेले आहेत, त्याचे निराकरण कशाप्रकारे होणार?
दादाश्री : अजून आपण जीवंत आहोत, तोपर्यंत पश्चाताप करून धुवून टाकायचे पण ते ठराविकच, सर्व निराकरण नाही होणार. पण ढीलेतर होऊनच जाईल. ढीले होऊन गेले म्हणजे येणाऱ्या जन्मात हात लावल्या बरोबर गाठ सुटून जाईल!
प्रश्नकर्ता : आपले ज्ञान मिळण्यापूर्वी नरकाचे बंध (कर्मबंधन) पडले असतील तर नरकात जावेच लागेल ना?
दादाश्री : त्याचे असे आहे की, हे ज्ञानच असे आहे की सर्व पापं भस्मीभूत होऊन जातात, बंध उडून जातात. नरकात जाणारा असो परंतु ते जीवंत आहे तोपर्यंत प्रतिक्रमण करणार तर त्याचे धुतले जाईल. पोष्टात पत्र टाकण्या अगोदर तुम्ही लिहिले की उपरोक्त वाक्य लिहितांना मन ठिकाणावर नव्हते तर ते उडून जाणार.
प्रश्नकर्ता : प्रायश्वितने बंध सुटून जाणार?
दादाश्री : होय, सुटून जाणार. अमूक प्रकारचे बंध आहेत, ते प्रायश्चित केल्याने मजबूत गाठीतून ढीले होऊन जाणार. आपल्या प्रतिक्रमणमध्ये खूप शक्ति आहे. दादांना हजेर करून केले तर...
कर्माच्या धक्क्याने जे जन्म होणारे असतील ते होतील. कदाचित् एक-दोन जन्म. परंतु त्याच्या नंतर सीमंधर स्वामींच्या जवळच जावे लागणार. हा इथला धक्का, तर पूर्वी बांधलेल्या हिशोबा प्रमाणे, जरा चिकट