Book Title: Pratikraman
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 93
________________ प्रतिक्रमण प्रश्नकर्ता : विचारांचे प्रतिक्रमण करावे लागतात? दादाश्री : विचारांना पहायचे. त्यांचे प्रतिक्रमण नाही. कोणासाठी खपच वाईट विचार येत असतील तर त्याचे प्रतिक्रमण करावे लागेल. पण कोणाचे नुकसान करणारी वस्तु असेल तरच. असेच्या असे आले, कोणत्याही प्रकारचे येवोत, गायीचे, म्हशीचे सर्व प्रकारचे विचार येवोत, ते तर आपल्या ज्ञानने उडून जाणार. ज्ञानच्या दृष्टिने पाहिले तर उडून जाणार. त्यांना पहायचे फक्त, त्यांचे प्रतिक्रमण करायचे नसतात. प्रतिक्रमण तर, आपला तीर कोणाला लागला असेल तरच करावे लागते. आपण इथे सत्संगला आलोत आणि येथे माणसं उभी असतील, तर मनामध्ये भाव बिघडतो, आणि वाटते की हे सर्व माणसं उभी का आहेत ? त्या चुकीसाठी त्याचे लगेच प्रतिक्रमण करायला हवे. प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण कर्मच्या फळांचे करायचे की सूक्ष्मचे करायचे? दादाश्री : सूक्ष्मचे करायचे. प्रश्नकर्ता : विचारांचे की भावचे? दादाश्री : भावचे. विचारांच्या मागे भाव असतोच. अतिक्रमण झाले तर प्रतिक्रमण करायलाच हवे. अतिक्रमण तर मनात वाईट विचार येतात. ह्या बहिणीसाठी वाईट विचार आला, तर 'विचार चांगला असायला पाहिजे', असे करून त्याला फिरवून टाकायचे. मनात असे वाटले की हा नालायक आहे, तर असा विचार का आला? आपल्याला त्याची लायकी-नालायकी, पहाण्याचा अधिकारच नाही. आणि सरसगट बोलायचे असेल तर बोलायचे की, 'सगळे चांगले आहेत' चांगले आहेत, बोललात तर तुम्हाला कर्मदोष नाही होणार, परंतु जर नालायक आहे बोलतात तर ते अतिक्रमण म्हटले जाईल. म्हणून त्याचे प्रतिक्रमण अवश्य करावे लागेल. नापसंतला स्वच्छ मनाने सहन केले तरच वीतराग होऊ शकणार. प्रश्नकर्ता : स्वच्छ मन म्हणजे काय?

Loading...

Page Navigation
1 ... 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114