Book Title: Pratikraman
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 94
________________ प्रतिक्रमण दादाश्री : स्वच्छ मन म्हणजे, समोरच्याचे प्रति वाईट विचार नाही येत ते, म्हणजे काय? निमित्तला चावायला धावत नाही. कदाचित् समोरच्याचे प्रति वाईट विचार आले तर त्वरितच प्रतिक्रमण करेल आणि धुवून टाकेल. प्रश्नकर्ता : स्वच्छ मन होऊन जाणे हे तर अंतिम पायरीची गोष्ट आहे ना? आणि जोपर्यंत संपूर्ण शुद्ध होत नाही तोपर्यंत प्रतिक्रमण करावेच लागेल ना? दादाश्री : हो, हे खरे, पण अमुक बाबतीत शुद्ध होऊन गेले असेल आणि अमुक बाबतीत नाही झाले असेल, ह्या सगळ्या पायऱ्या आहेत. जेथे शुद्ध नाही झाले असेल तेथे प्रतिक्रमण करावे लागेल. आपण शुद्धात्माचे वहीखाते स्वच्छ ठेवायचे. म्हणून रात्री चंदुभाईना सांगायचे की ज्यांचे ज्यांचे दोष दिसले असतील त्यांचे वहीखाते स्वच्छ करून टाका. मनाचे भाव बिघडले असतील तर प्रतिक्रमणाने सर्व शुद्धिकरण होऊन जाते. दुसरा काही उपाय नाही. इन्कमटॅक्सवाला पण दोषित नाही दिसणार, असे करून रात्री झोपून जायचे. सर्व जग निर्दोष पाहून नंतर चंदुभाईला झोपून जावा असे सांगायचे. प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण प्रत्यक्षात व्हायला पाहिजे ना? दादाश्री : प्रतिक्रमण मागाहून झाले तरी पण काही हरकत नाही. प्रश्नकर्ता : मी आपली अवहेलना केली असेल, अशातना केली असेल तर मला आपल्याकडे प्रत्यक्ष येवून प्रतिक्रमण करायला पाहिजे ना? दादाश्री : जर प्रत्यक्ष झाले तर चांगली गोष्ट आहे. नाही झाले तर मागहून करायचे, तरी पण सारखेच फळ मिळते. आम्ही काय सांगतो, 'तुम्हाला दादांसाठी एवढे उलट विचार येतात, म्हणून तुम्ही त्याचे प्रतिक्रमण करत रहा.' कारण की त्याचा काय दोष बिचाऱ्याचा. विराधक स्वभाव आहे. आजच्या सगळ्या माणसांचा स्वभावच विराधक आहे. दुषमकाळात विराधक जीवच असतात. आराधक जीव

Loading...

Page Navigation
1 ... 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114