Book Title: Pratikraman
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 89
________________ ७६ प्रतिक्रमण करायला जातो पण होत नाही!' तेव्हा मी सांगतो, अरे भाऊ, निकाल करायचा नाही! तुला समभावे निकाल करायचा भावच ठेवायचा आहे. समभावे निकाल होतो की नाही होत ते, तुझ्या आधीन नाही, तू माझ्या आज्ञामध्ये रहा ना! त्याने तुझी बरीचशी कामे पूर्ण होऊन जातील आणि नाही पूर्ण झाली तर ते 'नेचर'च्या आधीन आहे. समोरच्याचे दोष दिसणे बंद झाले तर संसार सुटणार. कोणी आपल्याला शिवीगाळ केली, नुकसान केले, मारले तरी त्याचे दोष नाही दिसले तेव्हा संसार सुटणार, नाहीतर संसार सुटणार नाही. आता लोकांचे दोष दिसणे बंद होऊन गेले? प्रश्नकर्ता : हो, दादा अधूनमधून दोष दिसले तर प्रतिक्रमण करून घेतो. दादाश्री : मार्ग हाच आहे की, 'दादाच्या आज्ञेमध्ये रहायचे आहे' असा निश्चय करून दुसऱ्या दिवसापासून सुरूवात करून द्या. आणि जेवढे आज्ञामध्ये नाही राहिले गेले तेवढ्याचे प्रतिक्रमण करून घेणे. आणि घरातील प्रत्येक माणसांना संतोष देणे, समभावे निकाल करून. तरीसुद्धा घरातील सर्व उड्या मारत असतील, तर आपण पहात रहायचे. आपला मागच्या जन्माचा हिशोब आहे म्हणून उड्या मारीत आहे. हे तर आजच नक्की केले आहे. अर्थात् घरातील सर्वांना प्रेमाने जिंकायचे. हे तर मग स्वत:ला पण कळते की आता सर्व काही ठिकाणे लागून राहिले आहे. तरीसुद्धा घरातील माणसं अभिप्राय देतील तेव्हाच ते मानने योग्य म्हणायचे. घरातील माणसं, शेवटी तर त्याच्याच पक्षमध्ये असतात. प्रश्नकर्ता : आपण जे प्रतिक्रमण करतो ते प्रतिक्रमणचे परिणाम, या मूळ सिद्धांतवर आहे की आपण समोरच्याच्या शुद्धात्माला पहातो तर त्याचे प्रति जे भाव आहेत, वाईट भाव आहेत, ते कमी होतील? दादाश्री : आपले वाईट भाव तुटून जातील. आपल्या स्वत:साठीच आहे हे सर्व. समोरच्याला काही घेणे-देणे नाही. समोरच्यातील शुद्धात्माला

Loading...

Page Navigation
1 ... 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114