Book Title: Pratikraman
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 81
________________ ६८ प्रतिक्रमण दादाश्री : समोरच्या व्यक्तिचे आपण नाही पाहायचे. तो तर वेडा पण असेल. आपल्या निमित्ते त्याला दुःख नाही झाले पाहिजे, बस! प्रश्नकर्ता : अर्थात कोणत्याही प्रकारे त्याला दुःख झाले तर त्याचे समाधान करायचे आम्ही प्रयत्न करायला पाहिजे. दादाश्री : त्याला दुःख झाले तर त्याचे समाधान अवश्य करायला हवे. ती आपली 'रिस्पोन्सिबिलिटी' (जबाबदारी) आहे. हो, दु:ख नाही व्हावे त्यासाठीच तर आपले आयुष्य आहे. प्रश्नकर्ता : परंतु समजा की असे करूनही समोरच्याचे समाधान होत नसेल, तर मग आमची जबाबदारी किती? दादाश्री : प्रत्यक्ष जावून जर डोळ्यांनी होत असेल तर डोळ्यांत नम्रता दाखवायची. अशी माफी मागितल्यावर त्याने चापट मारली तर समजून जायचे की तो नालायक आहे. तरीसुद्धा निकाल करायचा आहे. माफी मागितल्यावर त्याने चापट मारली तर समजून जायचे की त्याच्या बरोबर चुक तर झाली आहे, परंतु नालायक माणूस आहे त्यामुळे नम्रता दाखवणे बंध करा. प्रश्नकर्ता : हेतु चांगला असेल तर मग प्रतिक्रमण का करायचे? दादाश्री : प्रतिक्रमण तर करायला पाहिजे कारण त्याला दुःख झाले ना, आणि व्यवहारात लोक म्हणतात की, पहा ही बाई पतिला कशी धमकावत आहे. मग प्रतिक्रमण करावे लागेल. जे डोळ्यांना दिसते त्याचे प्रतिक्रमण करायचे. आतला हेतु तुमचा सोन्याचा असेल, पण काय कामाचा? तो हेतु नाही चालणार. हेतु शुद्ध सोन्याचा असला तरी पण आम्हाला प्रतिक्रमण करावे लागेल. चुक झाली की प्रतिक्रमण करायला हवे. ही सर्व महात्मांची इच्छा आहे. आता जगतकल्याणची भावना आहे, हेतु चांगला आहे पण तरीसुद्धा नाही चालत. प्रतिक्रमण तर अवश्य करायला हवे. कपड्यावर डाग पडला तर धुवून टाकता ना? असे हे कपड्यावरचे डाग आहेत. प्रश्नकर्ता : व्यवहारात कोणी चुक करत असेल तर त्याला टोकावे

Loading...

Page Navigation
1 ... 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114