Book Title: Pratikraman
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 79
________________ ६६ प्रतिक्रमण 'रिलेटिव धर्म' कसा असला पाहिजे की, खोटे बोलले गेले तर बोल पण त्याचे प्रतिक्रमण कर. २०. जागृति, वाणी वाहते तेव्हा... मनाची एवढी हरकत नाही, वाणीची हरकत आहे. कारण मन तर गुप्त प्रकारे चालत असते, पण वाणी तर समोरच्याच्या छातीत घाव करते. त्यासाठी या वाणीने ज्या ज्या माणसांना दुःख झाले असेल त्या सर्वांची क्षमा मागत आहे, असे प्रतिक्रमण करता येईल. प्रश्नकर्ता : प्रतिक्रमणने वाणीचे हे सर्व दोषं माफ होतील ना? दादाश्री : दोषांचे अस्तित्व राहील, परंतु जळालेल्या दोरी सारखे दोषांचे अस्तित्व राहील. म्हणून पुढच्या जन्मात आम्ही 'असे' केले की सर्व गळून पडतील. प्रतिक्रमणने, त्याच्यातील सर्व सत्व उडून जाणार. कर्ताचा आधार असेल तर कर्म बांधले जाणार. आता तुम्ही कर्ता नाही. म्हणुन पूर्वी बांधलेले कर्म आता फळ देवून पूरे होतील. नविन कर्म बांधले जाणार नाही. प्रश्नकर्ता : माणूस वैतागून बोलला ते अतिक्रमण नाही का? दादाश्री : अतिक्रमणच म्हणायचे ना! प्रश्नकर्ता : कोणाला दुःख होईल अशी वाणी निघून गेली आणि त्याचे प्रतिक्रमण नाही केले तर काय होणार? दादाश्री : अशी वाणी निघून गेली, तर त्यामुळे समोरच्याचा जिव्हारी लागेल, म्हणजे त्याला दु:ख होणार. समोरच्याला दु:ख होणार हे तर आपल्याला कसे आवडेल? प्रश्नकर्ता : त्याच्याने बंधन होणार? दादाश्री : हे कायदाच्या विरूद्ध म्हणायचे ना? कायदाचे विरूद्ध, झाले ना? कायदाचे विरूद्ध तर नाहीच व्हायला पाहिजे ना? आमची आज्ञा पाळली ना, त्याला धर्म म्हणतात. आणि प्रतिक्रमण करण्यात आपले काय

Loading...

Page Navigation
1 ... 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114