________________
६४
प्रतिक्रमण
दादाश्री : महात्मा, जर कधी माझ्या आज्ञेत राहिले तर त्यांचे कोणी नांव घेणार नाही या संसारात.
___ म्हणून लोकांना काय सांगतो की अजून सुद्धा सावधान होता येईल तर होऊन जा. अजून सुद्धा माफी मागितली ना, तर माफी मागायचा मार्ग आहे.
आपण एखाद्या नातेवाईकाला एवढे मोठे पत्र लिहिले असेल, आणि त्यात शिव्या दिल्या असतील, आपण खूप शिव्या दिल्या असतील, पूर्ण पत्र शिव्यांनी भरलेले असेल, पण मग खाली लिहीले की आज बायको सोबत भांडण झाले, त्यामुळे तुम्हाला असे लिहिले गेले, परंतु मला क्षमा करावे. तर सर्व शिव्या मिटून जाणार की नाही मिटून जाणार? अर्थात् वाचणारा सर्व शिव्या वाचणार, शिव्या स्वीकार करणार आणि नंतर तो माफ पण करणार! अर्थात् असा हा संसार आहे. म्हणून आम्ही तर सांगत असतो ना की माफी मागा, तुमच्या इष्टदेव जवळ माफी मागा तीथे नाही मागत असाल तर माझ्याजवळ मागा. मी तुम्हाला माफ करून देईल. पण खूप विचित्र काळ येत आहे आणि त्यात चंदुभाई आपली मनमानी करत आहे. त्याचा काही अर्थच नाही ना. जीवन जबाबदारीने भरलेले आहे ! सत्तर टक्के तर मी भीत-भीत सांगत आहे. अजून सुद्धा सावधान होता येत असेल तर सावध होऊन जा. ही शेवटची खात्री मी तुम्हाला देत आहे. भयंकर दुःख! अजूनसुद्धा प्रतिक्रमणरूपी हत्यार देत आहे. प्रतिक्रमण करणार तर अजूनही वाचण्याची काहीतरी संधी आहे आणि आमच्या आज्ञेप्रमाणे करणार तर तुमचेच झपाट्याने कल्याण होणार. पाप भोगावे लागतील पण इतके नाही.
हजारो माणसांच्या हजेरीत कोणी बोलले की, 'चंदुभाईमध्ये अक्कल नाही' तर आपल्याला आशीर्वाद द्यायचे मन होते की ओहोहो, आम्ही जाणत होतो की चंदुभाईमध्ये अक्कल नाही परंतु हे तर तो पण जाणतो आहे, तेव्हा वेगळेपण रहाणार!
ह्या चंदुभाईला आम्ही रोज बोलवितो की, यावे चंदुभाई यावे! आणि मग एक दिवशी नाही बोलविले, त्याचे काय कारण? त्याच्या मनात विचार