________________
प्रतिक्रमण
'या व्यक्ति प्रति माझा असा अभिप्राय बांधला गेला, ते चुकीचे आहे, माझ्याकडून असे का झाले?' असे म्हटले तर, अभिप्राय तुटून जाणार. तुम्ही जाहीर करा की, 'हा अभिप्राय चुकीचा आहे, या व्यक्ति प्रति असा अभिप्राय कसा बांधू शकतो? हे तर तुम्ही काय करीत आहात?' याप्रमाणे त्या अभिप्रायला चुकीचे म्हटले, म्हणजे तो सुटून जातो.
प्रतिक्रमण नाही केले तर तुमचा अभिप्राय राहिला, त्यामुळे तुम्ही बंधनांत आलात. जे दोष झाले त्यात तुमचा अभिप्राय राहिला, हे प्रतिक्रमण केले म्हणजे अभिप्राय तुटला. अभिप्रायमुळेच मन उभे झाले आहे. पहा मला, कोणत्याही माणसावर कोणताही अभिप्राय नाही. कारण की एकदा पाहून घेतल्या नंतर भी अभिप्राय बदलत नाही. कोणताही माणूस संयोगानुसार, चोरी करतो आणि मी स्वतः पाहिले तरीसुद्धा त्याला मी चोर म्हणत नाही. कारण की संयोगानुसार आहे. संसारी लोक काय बोलतात की जो पकडला गेला तोच चोर. संयोगानुसार होता की कायमचा चोर होता, त्याची संसारी लोकांना काही पर्वा नाही. मी तर कायमच्या चोरालाच चोर म्हणतो. आणि संयोगानुसारला मी चोर म्हणत नाही. अर्थात्, मी एक अभिप्राय बांधल्या नंतर ते कधी च बदलत नाही. कोणत्याही माणसाचा अभिप्राय आजपर्यंत बदलला नाही.
आपण शुद्ध झालो, आणि चंदुभाईला शुद्ध करायचे हे आपले कर्तव्य. हे पुद्गल काय म्हणत आहे की भाऊ, आम्ही शुद्ध च होतो. तुम्ही आम्हाला बिघडविले, भाव करून, या स्थितिपर्यंत आम्हाला बिघडविले. नाहीतर आमच्यामध्ये रक्त, पु, हाडं काहीच नव्हते. आम्ही शुद्ध होतो, तुम्ही आम्हाला बिघडविले. म्हणून जर तुम्हाला मोक्षाला जायचे असेल तर तुम्ही एकटेच शुद्ध होऊन चालणार नाही. आम्हाला शुद्ध केले तरच तुमची सुटका होणार.
१८. विषय-विकाराला जिंकतो तो राजांचा राजा
प्रश्नकर्ता : एकदा विषयविकाराचे बीज पडून गेले असेल तर ते रूपकमध्ये येईलच ना?
दादाश्री : बिज पडूनच जाणार ना. आणि ते रूपकमध्ये येणार परंतु