Book Title: Pratikraman
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 74
________________ प्रतिक्रमण दादाश्री : होऊन गेला तर माफी मागायची. ज्याच्या प्रति उलटा अभिप्राय झाला त्यासाठी त्याच माणसाची माफी मागायची. प्रश्नकर्ता : चांगला अभिप्राय द्यायचा की नाही? दादाश्री : कोणताच अभिप्राय द्यायचा नाही. आणि दिला गेला तर पुसून टाकावे. पुसून टाकायचे साधन आहे तुमच्या जवळ. आलोचनाप्रतिक्रमण-प्रत्याख्यानचे 'अमोघ अस्त्र'. प्रश्नकर्ता : गाढ अभिप्राय काढायचे कशा पद्धतिने? दादाश्री : जेव्हा पासून ठरविले की काढायचे आहेत तेव्हा पासून ते निघायला सुरूवात होते. खूप गाढ असतील तर रोज दोन-दोन तास अभिप्राय काढत राहिलात तर ते निघून जातील. आत्मा प्राप्त झाल्या नंतर, पुरुषार्थ धर्म प्राप्त झाला आणि पुरूषार्थ धर्म पराक्रम पर्यंत पोहचू शकतो, जे कुठल्याही प्रकारचे अडथळे उखडून फेकू शकतात. परंतु एकवेळा समजून घ्यायचे की या कारणामुळे हे उभे झाले आहे, मग त्याचे प्रतिक्रमण करावे. अभिप्राय होणार नाहीत एवढे जरा पहावे. सर्वात जास्त सावध रहा, अभिप्रायापासून. बाकी दूसरी काही हरकत नाही. काहींना तर पाहाण्याच्या अगोदरच अभिप्राय बांधले जातात, ही संसारजागृति एवढी जास्त आहे की अभिप्राय बांधले जातात. म्हणून अभिप्राय झाल्यावर आपण सोडून द्यावे. अभिप्राय प्रति खूपच सावधान रहाण्याची जरूरी आहे. अर्थात् अभिप्राय बांधले तर जातील पण बांधले गेले तर लगेच सोडून द्यावे. अभिप्राय प्रकृति बांधत असते, आणि प्रज्ञाशक्ति अभिप्राय सोडत असते. प्रकृति अभिप्राय बांधत रहाणार, अमुक वेळेपर्यंत बांधतच रहाणार, परंतु आपण ते सारखे सोडतच रहायचे. अभिप्राय बांधले गेले त्याचीच तर ही सर्व भानगड आहे. __ प्रश्नकर्ता : अभिप्राय बांधला गेला, तर तो सोडवायचा कशा प्रकारे? दादाश्री : अभिप्राय सोडवण्यासाठी आपण काय करायला हवे की

Loading...

Page Navigation
1 ... 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114