________________
प्रतिक्रमण
जोपर्यंत त्याचे मूळ मजबूत नाही झाले, तोपर्यंत कमी-जास्त होऊ शकते म्हणून ते मरण्याआधी शुद्ध होऊन जातील.
६३
त्यासाठी आम्ही विषयविकाराच्या दोषवाल्यांना सांगत असतो की विषयविकारी दोष झाले असतील, अन्य दोष झाले असतील, तर रविवारी उपवास करायचा आणि पूर्ण दिवसभर तेच विचार-मंथन करायचे. विचार करून-करून सारखे त्याला धुत रहाचये. असे आज्ञापूर्वक केले ना, म्हणजे कमी होत जाणार !
आता फक्त डोळ्यांना सांभाळायचे. पूर्वी तर खूपच कडक नेकीदार माणसं विषयविकारचे दोष होताच डोळे फोडून टाकायचे. आपल्याला डोळे फोडून टाकायचे नाही. ती मुर्खता आहे, आपण डोळे वळवून घ्यावे. तरी सुद्धा पाहिले गेले तर प्रतिक्रमण करायचे. एक मिनिट पण प्रतिक्रमण चुकवायचे नाही. खाण्या-पिण्यात चूका झाल्या असतील तर ते चालेल. संसाराचा सर्वात मोठा रोगच हा आहे. ह्याचामुळेच हा संसार उभा राहिला आहे. याच्या मूळावरच संसार उभा आहे. मूळच हे आहे.
हक्काचे खाणार तर मनुष्यात येणार, बिनहक्काचे खाणार तर जनांवरमध्ये जाणार.
प्रश्नकर्ता : आम्ही बिनहक्काचे तर खाल्ले आहे.
दादाश्री : खाल्ले आहे तर मग प्रतिक्रमण करा ना, अजूनही भगवान वाचवतील. अजूनही देरासर (मंदिर) मध्ये जावून पश्चाताप करा. बिनाहक्काचे खाल्ले गेले असेल तर अजूनही प्रतिक्रमण करा, अजून जीवंत आहात. या देहात आहात तोपर्यंत पश्चाताप करा.
प्रश्नकर्ता : एक भीती वाटली, आताच आपण सांगितले की सत्तर टक्के लोक पुन्हा चार पाया (जनावर गतित) मध्ये जाणार आहेत, तर अजून आमच्या जवळ वेळ आहे की नाही?
दादाश्री : नाही, नाही, वेळ राहिला नाही त्यासाठी आता तरी सावध व्हा काही...जरा....
प्रश्नकर्ता : ज्ञान घेतलेल्या महात्मा बद्दल सांगत आहे.