________________
प्रतिक्रमण
लागते, त्यामुळे त्याला दु:ख होत असते, तर कशाप्रकारे त्याचा निकाल लावायचा?
दादाश्री : व्यवहारात टोकावे लागते, पण त्यात अहंकारासहित होते म्हणून प्रतिक्रमण करायला पाहिजे.
प्रश्नकर्ता : टोकले नाही तर तो डोक्यावर चढेल?
दादाश्री : टोकायला तर पाहिजे. पण सांगता आले पाहिजे. सांगता नाही येत, व्यवहार नाही येत म्हणजे अहंकारासहित टोकणे होणार. त्यासाठी मग त्याचे प्रतिक्रमण करायचे. तुम्ही समोरच्याला टोकले म्हणजे समोरच्याला वाईट तर वाटणार पण त्याचे प्रतिक्रमण वारंवार करीत राहिलात म्हणजे सहा महिन्यानी, बारा महिन्यानी वाणी अशी निघेल की समोरच्याला मधूर लागेल.
आता जर आम्ही कोणाची गम्मत केली तर त्याचे आम्हाला प्रतिक्रमण करावे लागते. आम्हाला असे च्या असे चालत नाही.
प्रश्नकर्ता : ती तर गम्मत म्हणायची, असे तर होत रहाते ना!
दादाश्री : नाही, तरीसुद्धा आम्हाला प्रतिक्रमण करावे लागेल. तुम्ही नाही केले तर चालेल, पण आम्हाला प्रतिक्रमण करावे लागेल, नाहीतर आमचे हे ज्ञान, ही 'टेपरेकार्ड' (वाणी) निघत असते ना, ती फीकी निघते.
बाकी, मी तर सर्व प्रकारची मस्करी केली होती. सर्व प्रकारची मस्करी कोण करणार? खूपच टाईट ब्रेन (तेज बुद्धि) असेल तो करणार. मी तर लहरीप्रमाणे मस्करी करत होतो, सर्वांची. चांगल्या-चांगल्या माणसांची, मोठमोठ्या वकीलांची, डॉक्टरांची मस्करी करत होतो. आता वाटते की तो सर्व अहंकारच होता ना! तो आमच्या बुद्धिचा दुरुपयोगच केला ना! मस्करी करणे हे बुद्धिचीच निशाणी आहे.
प्रश्नकर्ता : मस्करी करण्यात धोका काय आहे? कोणत्या प्रकारचा धोका येतो?