________________
प्रतिक्रमण
७१
दादाश्री : तद्नंतर तर काही वेगळ्याच प्रकारची होणार. आमची वाणी सर्वोकृष्ट श्रेणीची निघत आहे त्याचे कारणच प्रतिक्रमण आहे आणि निर्विवादी आहे त्याचे कारण पण प्रतिक्रमणच आहे. नाहीतर विवादच असेल. सर्वत्र विवादी वाणी असते. व्यवहारशुद्धि विना स्यावाद वाणी निघतच नाही. व्यवहार शुद्धि प्रथम व्हायला पाहिजे.
२१. सुटतात प्रकृति दोष असे... हे सत्संगचे विष पिणे चांगले आहे. परंतु बाहेरचे अमृत पिणे वाईट आहे. कारण की हे विष प्रतिक्रमणयुक्त आहे. आम्ही सर्व विषाचे पेले पिवून महादेवजी झालो आहोत.
प्रश्नकर्ता : आपल्या जवळ यायला खुपच विचार करतो पण येणे होत नाही.
दादाश्री : तुमच्या हातात कोणती सत्ता आहे? तरी पण यायचा विचार करतो आणि येणे होत नाही त्याचा मनात खेद व्हायला पाहिजे. आपण त्याला सांगायचे की, चंदुभाई प्रतिक्रमण करा ना, लवकर उलगडा होईल. जाणे होत नाही त्यासाठी प्रतिक्रमण करा, प्रत्याख्यान करा. अशी भूलचुक झाली पण पुन्हा अशी भूलचुक नाही करणार.
आता जे भाव येत आहेत ते कशामुळे जास्त येत आहेत? आणि कार्य का नाही होत? भाव कशामुळे येत आहेत की, कमिंग इवेन्टस् कास्ट देर सँडोज बीफोर. (जे होणार आहे त्याचे चाहूल आधी लागते) या सर्व गोष्टी होणार आहेत.
प्रश्नकर्ता : चिंता होत असेल तर त्याचे प्रतिक्रमण कशाप्रकारे करायचे?
दादाश्री : 'माझ्या अहंकारामुळे ही चिंता होते. मी त्याचा कर्ता थोडाच आहे? म्हणून दादा भगवान क्षमा करा.' असे काहीतरी करावे लागेलच ना? त्या शिवाय चालणार कसे?
प्रश्नकर्ता : आपण खूप थंडी पडली, खूप थंडी पडली असे बोललो हे प्रकृतिच्या विरुद्ध बोललो तर त्याचे प्रतिक्रमण करायचे?