________________
प्रतिक्रमण
६५
येईल की आज मला पुढे नाही बोलविले. आम्ही त्याला चढवतो, पाडतो, चढवतो आणि पाडतो, असे करीत करीत तो ज्ञान पावतो. आमच्या ह्या सर्व क्रिया ज्ञान मिळविण्यासाठी आहेत. आमची प्रत्येक क्रिया ज्ञान प्राप्ति करून देण्यासाठी आहे. प्रत्येकां बरोबर वेगळी-वेगळी असते, त्याची प्रकृति निघूनच जायला हवी ना. प्रकृति तर काढावीच लागणार. परकी वस्तु कुठपर्यंत आपल्या जवळ रहाणार?
प्रश्नकर्ता : खरी गोष्ट आहे, प्रकृति निघाल्या शिवाय सुटकाच नाही.
दादाश्री : हो. आमची प्रकृति तर निसर्गाने काढली, आमची तर ज्ञानाने काढली.(ज्ञान प्राप्ति झाल्यावर संपली) आणि तुमची तर आम्ही काढणार तेव्हाच ना, निमित्त आहोत ना!!
१९. खोटे ची लत्त आहे त्याला... प्रश्नकर्ता : आम्ही खोटे बोललो असेल ते पण कर्मबांधले म्हणायचे
ना?
दादाश्री : नक्कीच! परंतु खोटे बोलले असाल, त्यापेक्षा खोटे बोलण्याचे भाव केले ते मोठे कर्म म्हणायचे. खोटे बोलणे हे तर म्हणा की कर्मफळ आहे. खोटे बोलण्याचे भावच, खोटे बोलण्याचा आमचा निश्चय, त्याने कर्मबंध होत असतात. तुमच्या लक्षात आले? हे वाक्य तुम्हाला मदत करेल काही? काय मदत करणार?
प्रश्नकर्ता : खोटे बोलणे बंद व्हायला हवे.
दादाश्री : नाही, खोटे बोलायचा अभिप्रायच सोडून द्यायला हवा. खोटे बोलले गेले तर पश्चाताप करायला पाहिजे की काय करू? असे खोटे नाही बोलायला पाहिजे.' त्याने खोटे बोलणे बंद नाही होऊ शकत. पण तो अभिप्राय बंद होईल. 'आता आजपासून खोटे नाही बोलणार, खोटे बोलणे हे महापाप आहे, महादुःखदायी आहे, आणि खोटे बोलणे हेच बंधन आहे.' असा अभिप्राय जर तुमच्याकडून झाला तर तुमचे खोटे बोलण्याचे पाप बंद होऊन जाणार.