________________
३८
प्रतिक्रमण
निघालेत आपले, म्हणून त्याला ते जीव्हारी लागतील हे नक्की. ते मानून आपण प्रतिक्रमण करून टाकायचे. कठोर शब्द निघाले असतील तर ते आपल्याला माहित नाही होणार का? की ते त्याला जीव्हारी लागले असतील?
प्रश्नकर्ता : माहित होईल ना!
दादाश्री : हे पण त्याच्यासाठी करायचे नाही आहे. परंतु आपला अभिप्रायापासून दूर होण्यासाठी आहे. प्रतिक्रमण म्हणजे काय? ते समोरच्यावर जो परिणाम होत असेल तो नाही होत, अजिबात नाही होत. मनात नक्की ठेवायचे की, मला समभावे निकाल करायचा आहे. तर त्याच्यावर परिणाम पडणार आणि त्याचे मन असे सुधरेल, आणि जर मनामध्ये नक्की केले की त्याचे असे करून टाकू आणि तसे करून टाकू, तर त्याचे मन पण तशीच रीएक्शन (प्रतिक्रिया) घेते.
प्रश्नकर्ता : एखाद्या माणसाला झिडकारले नंतर पश्चाताप होतो त्याला काय म्हणायचे?
दादाश्री : पश्चाताप झाला म्हणजे झिडकारण्याची सवय सुटून जाणार, थोडे दिवस झिडकारले, नंतर पस्तावा नाही केला आणि मी किती चांगले केले असे मानले तर ते नरकात जाण्याची निशाणी आहे. खराब केल्यानंतर त्याचा पश्चाताप तर करायला च पाहिजे.
प्रश्नकर्ता : समोरच्याचे मन दुखावले गेले असेल तर त्यातून सुटण्यासाठी काय करायचे?
दादाश्री : प्रतिक्रमण करणे आणि समोरचा भेटला तर त्याला तोंडाने बोलायचे की भाऊ माझ्यात अक्कल नाही, माझी चुक झाली, असे बोलल्याने त्याचा घाव भरून जाईल.
प्रश्नकर्ता : काय उपाय करावा की, ज्याने झिडकारण्याचा परिणाम भोगण्याची पाळी न यावी?
दादाश्री : झिडकारसाठी दुसरा काही उपाय नाही, फक्त प्रतिक्रमण सतत करत राहणे. जो पर्यंत समोरच्याच्या मनाचे परिवर्तन नाही होत तोपर्यंत