________________
प्रतिक्रमण
चिडतो तर चंदुलाल. त्या चंदुलालला मग आपण सांगायचे, आता दादा मिळाले आता तरी चिडणे कमी करा ना !!
५४
प्रश्नकर्ता : पण त्यां सेक्रेटरीं मध्ये ईम्प्रुव (सुधार) नाही होत. तर त्यांचे काय करायचे? सेक्रेटरींना काही सांगावे तर लागते ना, नाहीतर त्या तशीची तशीच चुक करत रहातात, त्याकाम बरोबर करीत नाही.
दादाश्री : ते तर आपण चंदुभाईला सांगायचे त्यांना दटवा, थोडे दटवा. जरा समभावे निकाल करून दटवा. वरपांगी नाटकीय रीतीने लढायचे की असे करणार तर तुमची सर्विस कशी राहणार? असे सर्व सांगायचे.
प्रश्नकर्ता : पण त्यांना त्यावेळी दुःख होईल आणि आपण सांगितले आहे की दुःख नाही द्यायचे दुसऱ्यांना.
दादाश्री : दु:ख नाही होणार, कारण की आपण जर ते नाटकीय रीतीने बोललो ना तर दुःख नाही होणार त्यांना, फक्त त्यांच्या मनात जागृति येईल, त्यांचा निश्चय बदलणार. आपण दुःख नाही देत, दु:ख तर केव्हा होईल? आपला हेतू जर तसा असेल तर, दुःख उत्पन्न होईल. आपला हेतू दुःख द्यायचा असेल ना, की यांना सरळ करून टाकायचे. तर त्यांना दु:ख उत्पन्न होणार.
चिडण्याचा ज्ञाता-द्रष्टा राहिलो तर शुद्ध होऊन चिडण्याचे निघून जाते. ते परमाणु शुद्ध होऊन निघून गेलेत. एवढे तुमचे कर्तव्य.
प्रश्नकर्ता : चिडल्यानंतर प्रतिक्रमण केले तर तो पुरुषार्थ म्हणायचा की पराक्रम म्हणायचा?
दादाश्री : तो पुरुषार्थ म्हणायचा, पराक्रम नाही म्हणायचा. प्रश्नकर्ता : तर मग पराक्रम कोणाला म्हणायचे?
दादाश्री : पराक्रम तर या पुरुषार्थच्याही वर आहे. आणि हे तर पराक्रम नाही. हे तर जखम जळजळत असेल तर औषध चोपडायचे याच्यात पराक्रम कुठून आला? ह्या सर्वांना जाणतो, आणि हा जाणकार जाणतो त्याचे नांव पराक्रम. आणि प्रतिक्रमण करणे त्याचे नांव पुरुषार्थ.