Book Title: Pratikraman
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 70
________________ प्रतिक्रमण ५७ दादाश्री : त्याला भाव बिघडला म्हणतात, ज्ञानची जागृति नाही म्हणावी. प्रश्नकर्ता : त्याला हिंसकभाव म्हणायचा? दादाश्री : हिंसकभाव तर काय परंतु होता तसा होऊन गेला असे म्हणणार. पण नंतर प्रतिक्रमण केले तर धुतले जाणार. प्रश्नकर्ता : पण मग दुसऱ्या दिवशी सुद्धा तसेच केले तर? दादाश्री : अरे शंभरवेळा केले तरी पण धुतले जाईल. मारून टाकायचा तर विचार पण नाही करायचा. कोणती पण वस्तू अनुकूल नसेल तर बाहेर सोडून यायचे. तीर्थंकरांनी 'मार' शब्दच निकाल बाहेर केला होता. 'मार' शब्दच बोलायचा नाही असे म्हटले आहे. 'मार' हाच जोखीमदार शब्द आहे. एवढे सर्व अहिंसामय, एवढ्या मात्रात परमाणु अहिंसक व्हायला पाहिजे. प्रश्नकर्ता : भावहिंसा आणि द्रव्यहिंसाचे फळ एकच प्रकारचे येते ? दादाश्री : भावहिंसाचा फोटो दुसरे कोणी नाही पाहू शकत आणि जे सिनेमासारखा हा जो सिनेमा चालत आहे आत तो आपण पाहात असतो, अर्थात भावहिंसामध्ये असे सूक्ष्मरूपात होत असते. आणि द्रव्यहिंसा तर दिसत असते, प्रत्यक्ष मन-वचन-कायाने जो संसारमध्ये दिसत आहे, ते द्रव्यहिंसा आहे. तुम्ही म्हणणार की जीवांना वाचविणे योग्य आहे, मग ते वाचो की न वाचो त्याला जोखीमदार तुम्ही नाही. तुम्ही म्हणा की, ह्या जीवांना वाचविणे योग्य आहे, तुम्हाला एवढेच करायचे. मग हिंसा होऊन गेली, त्याला जोखीमदार तुम्ही नाही! हिंसा झाली त्याचा पस्तावा, त्याचे प्रतिक्रमण करायचे म्हणजे जोखीमदारी सर्व संपली. प्रश्नकर्ता : आपल्या पुस्तकात वाचले की, 'मन-वचन-कायाने कोणत्याही जीवाला किंचित्मात्र दुःख नाही हो' पण आम्ही ठरलो शेतकरी, तर तंबाखूचे पीक लागवड करतो, त्यावेळी आम्हाला प्रत्येक, कोंब, म्हणजे त्यांचे शेंडे (डोके) तोडावे च लागतात तर त्यामुळे त्याला दुःख तर झाले

Loading...

Page Navigation
1 ... 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114