________________
प्रतिक्रमण
जाईल, म्हणून महावीर भगवानांनी आलोचना, प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान या तीन वस्तु एकाच शब्दात दिले आहे. दुसरा काही मार्गच नाही. आता स्वतः प्रतिक्रमण कधी करू शकणार? स्वत:ला जागृति असेल तेव्हा, ज्ञानीपुरुष पासून ज्ञान प्राप्त होईल तेव्हा ही जागृति उत्पन्न होईल.
__ आपण तर प्रतिक्रमण करून घ्या, म्हणजे आपण जबाबदारीतून सुटलो.
प्रश्नकर्ता : एखाद्या माणसावरचा आपला विश्वास उडून गेला असेल, त्याने आपल्या बरोबर विश्वासघात केला म्हणून आपला विश्वास उडून गेला असेल. तो विश्वास परत मिळविण्यासाठी काय करायला पाहिजे?
दादाश्री : त्याचे प्रति जे खराब विचार केले असतील ना, तर त्याचा पश्चाताप करायला पाहिजे. विश्वास उडून गेल्यानंतर आपण जे जे खराब विचार केले असतील, त्याचा पश्चाताप करावा लागेल. नंतर पूर्ववत् होऊन जाईल. म्हणून प्रतिक्रमण करावे लागेल.
९. निर्लेपता, अभावपासून फाशी पर्यंत प्रश्नकर्ता : समोरच्या माणसाला दु:ख झाले हे कसे माहित होणार?
दादाश्री : ते तर त्याच्या चेहरा-मोहरावरून लगेच माहित पडते. चेहरावरचे हास्य लुप्त होते. त्याच्या चेहरा बिघडून जातो. म्हणून त्वरितच माहित होते ना, की समोरच्यावर परिणाम झाला आहे असे नाही माहित पडत?
प्रश्नकर्ता : हो माहित पडते.
दादाश्री : माणसात एवढी शक्ति तर असतेच की समोरच्यावर काय परिणाम झाला ते माहित होणार!
प्रश्नकर्ता : परंतु बरेचसे असे शहाणे असतात की जे चेहरावर काहीच एक्स्प्रेशन्स (हावभाव) नाही येवू देत.
दादाश्री : तरी ही आपल्याला जाणीव असते की हे शब्द खूप कठोर