Book Title: Pratikraman
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 49
________________ प्रतिक्रमण बोलण्यास हरकत नाही की 'हा माझा मोठा मुलगा शतायु.' पण सर्व वरकरणी, नाटकीय. या सर्वांना खरे मानले त्याचेच प्रतिक्रमण करावे लागतात. जर खरे नाही मानले असते तर त्याचे प्रतिक्रमण करावे लागले नसते. जेथे सत्य मानण्यात आले, तेथे राग (आसक्ति, मोह) आणि द्वेष सुरु होऊन जातो आणि प्रतिक्रमणानेच मोक्ष आहे. हे 'दादा' दाखवित आहेत ते आलोचना-प्रतिक्रमण-प्रत्याख्याननेच मोक्ष आहे. ___ कोणाच्या हातात त्रास देण्याची पण सत्ता नाही आणि सहन करण्याची पण सत्ता नाही. हे तर सर्व पुतळेच आहे. ते सर्व काम करत आहेत. तर आमचे प्रतिक्रमण केल्यामुळे पुतळे आपणहून सरळ होऊन जातात. बाकी कसाही वेडा मनुष्य असो, आमच्या प्रतिक्रमणाने शहाणा होऊ शकतो. एका माणसा बरोबर तुमचे बिलकूल पटत नाही, त्याचे तुम्ही संपूर्ण दिवस प्रतिक्रमण करा, दोन-चार दिवसापर्यंत करीत राहिलात तर पांचव्या दिवशी तो तुम्हाला शोधत येईल इथे. तुमच्या अतिक्रमण दोषामुळेच हे सर्व अडलेले आहे. प्रश्नकर्ता :ह्याच्यात काही वेळा आपल्याला नाराजगी होऊन जाते की, मी इतके सर्व करतो तरी ते माझा अपमान करतात? दादाश्री : आपल्याला त्याचे प्रतिक्रमण करायला हवे. हा तर व्यवहार आहे. याच्यात सर्व प्रकारचे लोक आहेत. ते मोक्षमध्ये नाही जाऊ देणार. प्रश्नकर्ता : हे प्रतिक्रमण आम्ही कशासाठी करायचे? दादाश्री : प्रतिक्रमण यासाठी करायचे की ह्यात माझ्या कर्मचा उदय होता, आणि त्याला असे कर्म बांधावे लागले. त्याचे प्रतिक्रमण करीत आहे आणि पुन्हा असे करणार नाही की जेणेकरून कोणाला माझ्या निमित्ताने कर्म बांधावे लागेल! संसार कोणालाही मोक्षात जावू देईल असे नाही. सर्व बाजूने आकडे टाकून खेचूनच आणेल. त्यासाठी आम्ही प्रतिक्रमण केले तर आकडा सुटून

Loading...

Page Navigation
1 ... 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114