________________
प्रतिक्रमण
दादाश्री : नाही, अशी समज ठेवायची नाही, गोष्ट अशीच आहे. आपल्याला प्रतिक्रमण करायचे आहे. प्रतिक्रमण केले म्हणजे आपण सुटलो. तुमच्या जबाबदारीतून तुम्ही सुटलात. नंतर मग तो चिंता करून, डोके फोडून मरून पण गेला, तरी त्याचे तुम्हाला काही घेणे-देणे नाही.
४०
आमच्याकडून पण कोणत्या - न - कोणत्या माणसाला दुःख होत असते, आमची इच्छा नाही आहे, तरीसुद्धा. आता असे आमच्याकडून होतच नाही, पण एखाद्या माणसाबरोबर होऊन जाते. आतापर्यंत पंधरा-वीस वर्षामध्ये दोन-तीन माणसांना झाले असेल, ते पण निमित्त असणार त्यामुळे ना? आम्ही त्यानंतर त्यांचे सर्व प्रतिक्रमण करून त्याच्यावर पुन्हा कुंपण लावतो जेणेकरून ते पडून नाही जाणार. जेवढे आम्ही चढविले आहे तेथून ते खाली पडणार नाही त्यासाठीची कुंपण, त्याचे सर्व रक्षण करून नंतर लावतो.
आम्ही सिद्धांतिक आहोत की, भाऊ, हे झाड रोवले, रोवल्यानंतर रोडच्या एका लाईनदोरीमध्ये येत असेल तर, रोडला फिरवायचे पण झाडाला काही नाही होवू द्यायचे. असा आमचा सिद्धांत असणार. असे कोणाला पडू नाही देणार.
प्रश्नकर्ता : कोणी मनुष्य चुक करतो, नंतर आपल्या जवळ माफी मागतो, आम्ही माफ करून देतो माफी नाही मागितली तरी आपण मनापासून माफ करून देतो, पण तो मनुष्य पुन्हा-पुन्हा चुक करतो तर आम्ही काय करायचे?
दादाश्री : प्रेमाने समजावून, समजवता येईल शकणार तेवढे समजावयाचे, दुसरा काही उपाय नाही आणि आपल्या हातात काहीच सत्ता नाही. आपण माफ केल्यावरच सुटका आहे या संसारामध्ये. नाही माफ केले तर मार खावून माफ करावे लागेल तुम्हाला. उपायच नाही. आपण त्याला समज द्यावी. पुन्हा पुन्हा ती चुक नाही करणार, असा त्याने भाव परिवर्तन केला तर खूप होवून गेले. त्याने भाव परिवर्तन केला की पुन्हा अशी चुक करणार नाही, तरीसुद्धा (चुक) झाली तर ही वेगळी गोष्ट आहे.
मुलाला भाजी घ्यायला पाठविले, आणि त्यातून तो पैसे काढून घेतो