________________
प्रतिक्रमण
तर नंतर ते जाणून घेतल्यावर काय फायदा आहे? तो तर जसा आहे तसे निभावून घ्यायचे, टाकून देणार का? दुसरे घ्यायला जाणार का? दुसरा मिळनार नाही ना? कोणी विकत नाही.
१०. संघर्षाच्या प्रतिपक्षात प्रश्नकर्ता : अमुक कर्मामध्ये जास्त, लांब बोलाचाली झाली असेल तर, लांब बंधन बांधले जाईल, तर त्यासाठी प्रतिक्रमण दोन-चारवेळा की जास्तवेळा करावे लागणार, की नंतर एक वेळा केल्याने होऊन जाईल सर्वच?
दादाश्री : जेवढे होवू शकेल तेवढे करायचे. आणि नंतर एकत्र करून टाकायचे. प्रतिक्रमण खूप जमा झालीत, तर एकत्र प्रतिक्रमण करायचे. 'हे दादा भगवान! या सर्वांचे मी एकत्र प्रतिक्रमण करीत आहे.' मग सुटका झाली.
ज्याला संघर्ष नाही होत त्याला तीन जन्मात मोक्ष होईल त्याची मी गॅरंटी देत आहे. संघर्ष होवून गेला तर प्रतिक्रमण करायचे. संघर्ष पुद्गलचा आहे. आणि *पुद्गल, पुद्गलचा संघर्ष प्रतिक्रमणाने नष्ट होत असते.
तो भागाकार करत असेल तर आम्ही गुणन करायचे, त्यामुळे रक्कम उडून जाते. समोरच्या माणसासाठी विचार करायचा की, 'तो मला असा म्हणाला, तसा म्हणाला,' हाच गुन्हा आहे. या रस्त्याने जातेवेळी भिंती बरोबर टक्कर झाल्यावर तिच्याशी का भांडत नाही? झाडाला जड (निश्चेतन) का म्हणायचे? ज्याने मार लागतो, ते सर्व हिरवे झाडच आहेत !
प्रश्नकर्ता : स्थूळ संघर्षचा दाखला दिला, मग सूक्ष्म, सूक्ष्मतर, आणि सूक्ष्मतमचा दाखला. सूक्ष्म संघर्ष कसा होतो?
दादाश्री : तुझे वडीलां बरोबर जे होते ते सर्व सूक्ष्म संघर्ष. प्रश्नकर्ता : म्हणजे कसे समजायचे?
दादाश्री : त्यात काय मारपीट करतात? *पुद्गल = शरीरात असलेला आत्मा शिवायचा भाग जे पूरण होत असतो आणि गलन होत असतो जसे की मन-बुद्धि-चित्त-अहंकार, कषाय इत्यादि सर्व.