________________
प्रतिक्रमण
८. 'अशी' तुटणार शृंखला ऋणानुबंधची प्रश्नकर्ता : पूर्वजन्माचे ऋणानुबंधातून सुटण्यासाठी काय करायले पाहिजे?
दादाश्री : आपले ज्यांच्या बरोबर पूर्वीचे ऋणानुबंध आहेत, आणि ते आपल्याला पसंत नाही. त्याच्या बरोबर सहवास पसंतच नाही होत, आणि तरीसुद्धा सहवासात रहावे लागत आहे, अनिवार्य प्रकारे, तर काय करायला पाहिजे की बाहेरचा व्यवहार त्याच्या बरोबर ठेवायचा खरा पण आत त्याच्या नांवाचे प्रतिक्रमण करायला हवे. कारण आपण मागच्या जन्मात अतिक्रमण केले होते त्याचा हा परिणाम आहे. 'कोझीझ' (कारणे) काय केले होते? तेव्हा म्हणे, मागच्या जन्मात त्याच्या बरोबर अतिक्रमण केले होते. त्या अतिक्रमणाचे ह्या जन्मात फळ आले. म्हणून त्याचे प्रतिक्रमण केले तर प्लस-मायनस (अधिक-उणे) होऊन जाईल. अर्थात् आतून तुम्ही त्याची माफी मागून घ्या. माफी माग माग करायची की मी जे जे दोष केले आहेत त्यांची माफी मागत आहे. कोणत्याही भगवानांच्या साक्षीत, माफी मागा तर सर्व संपून जाईल.
सहवास नाही आवडल्यानंतर काय होत असते? त्याचे प्रति खूपच दोषित दृष्टिने पाहिल्यानंतर, काही पुरुषांना स्त्री आवडत नसेल तर तो खूपच दोषित दृष्टिने पहात असतो, अंततः तिरस्कार होतो. त्यामुळे भिती वाटते, ज्याचा आपल्याला तिरस्कार आहे त्याची आपल्याला भिती वाटेल. त्याला पाहिल्या बरोबर मनाचा थरकाप झाला, तर समजायचे की हा तिरस्कार आहे. म्हणून तिरस्कार सोडण्यासाठी सतत माफी मागतच रहा, दोनच दिवसात तो तिरस्कार बंद होऊन जाईल. त्याला नाही समजणार परंतु तुम्ही आतून वारंवार माफी मागतच रहा, त्याची. ज्याच्या प्रति जे जे दोष केले असतील, हे भगवान! मी क्षमा मागत आहे. हा दोषांचा परिणाम आहे, तुम्ही कोणत्याही मनुष्या प्रति जे जे दोष केले असतील, तर आतून तुम्ही भगवंतापासून माफी मागतच रहा, तर सर्व दोष धुतले जातील.
हे तर नाटक आहे. नाटक मध्ये बायको-मुलांना कायमचे आपले करून घेतले तर ते काय चालू शकणार? हो, नाटक मध्ये बोलतात तसे