________________
प्रतिक्रमण
करायचे असेल तर एवढे करा, शक्ति मागा. शक्ति कर्ताभावने मागा असे म्हटले आहे.
प्रश्नकर्ता : अर्थात्, ज्ञान घेतले नाही त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे ?
दादाश्री : हा, ज्ञान नाही घेतले असेल. जगाच्या लोकांसाठी आहे. बाकी आता ज्या मार्गाने लोक चालत आहेत ना, तो पूर्णतः उलटा मार्ग आहे. म्हणून ते कोणत्याही माणसाला जरा सुद्धा हितकारी होत नाही.
'करायचे आहे पण होत नाही' कर्मचा उदय वक्र असेल तर काय होणार? भगवानने तर असे सांगितले होते की उदय स्वरूपात राहून त्याला जाणायचे. करण्याचे नाही सांगितले होते. त्याला जाणा' एवढेच सांगितले होते. तेव्हा तुम्ही तर 'हे केले, पण होत नाही, करत आहे पण होत नाही. खूपच इच्छा आहे पण होत नाही' असे बोलत आहात. अरे, पण त्याला का गा-गा करत आहे, फालतू विना कामाचे. 'माझ्याने होत नाही, होत नाही.' असे चिंतन केल्याने आत्मा कसा होऊन जाणार? दगड होऊन जाणार. आणि हा तर क्रियाच करायला जात आहे. आणि सोबत होत नाही, होत नाही, होत नाही बोलत आहे.
मी सांगत आहे की नाही बोलायचे, अरे, ‘होत नाही' असे तर बोलायचेच नाही. तू तर अनंत शक्तिवाला आहे, आम्ही समजावल्यानंतर 'मी शक्तिवाला आहे' बोलतो. नाहीतर आता पर्यंत होत नाही' असेच बोलत होता! अनंत शक्ति कुठे निघून गेली आहे का?!
कारण की माणूस करू शकेल असा नाही. मनुष्य स्वभाव करू शकेल असा नाही. करणारी परसत्ता आहे. हे जीव फक्त जाणणारेच आहेत. म्हणून तुम्हाला हे जाणत राहायचे आहे, आणि तुम्ही हे जाणले तर जी चुकीची श्रद्धा बसली होती ती उडून जाणार. आणि तुमच्या अभिप्रायमध्ये बदल होणार. काय बदल होणार? 'खोटे बोलणे चांगले आहे', हा अभिप्राय उडून जाणार. हा अभिप्राय उडाला त्याचा सारखा कोणताच पुरुषार्थ नाही ह्या दुनियेत. ही गोष्ट सूक्ष्म आहे, पण खूप खूप विचार करणे योग्य आहे.
प्रश्नकर्ता : नाही, पण गोष्ट लॉजिकल (तार्किक) आहे.