________________
२४
प्रतिक्रमण
का आलो? तो निगेटिव (निषेधात्मक) पुरुषार्थ आपल्या आत झाला आहे, त्याचे फळ आपल्याला भोगावे लागेल, त्याला नालायक बोलण्याचे फळ आपल्याला भोगावे लागेल, पाप भोगावे लागेल. आणि विचार येणे हे स्वभाविक आहे, पण त्वरित आतमध्ये काय करायला हवे? की अरेरे, मला कशासाठी असा गुन्हा करायला हवा? असे लगेच, चांगला विचार करून आपण पुसून टाकायला पाहिजे.
हो, 'महावीर' भगवानां चे स्मरण करून अथवा अन्य कोणाचे स्मरण करून, 'दादाचे' स्मरण करून, प्रतिक्रमण करून घ्याला पाहिजे की अरेरे ! तो कसा पण असो, माझ्या हातून का उलटे झाले? चांगल्याला चांगले म्हणणे हा दोष नाही, पण चांगल्याला वाईट म्हणणे हा दोष आहे आणि वाईटास वाईट म्हणणे पण जबरदस्त दोष आहे, जबरदस्त दोष कारण की वाईट तो स्वतः नाही! त्याच्या प्रारब्धाने त्याला वाईट बनविले आहे. तो स्वतः वाईट नाही. प्रारब्ध म्हणजे काय? त्याच्या संयोगा ने त्याला वाईट बनविले, यात त्याचा काय गुन्हा?
येथून सर्व स्त्रीयां जात असतील, त्यावेळी कोणी आपल्याला दाखवतो की, ती पहा वेश्या, येथे आली आहे, कुठून आली? असे तो म्हणेल, तेव्हा आपण पण त्याचे ऐकून तिला वेश्या म्हटले, तर आपल्याला भयंकर गुन्हा लागणार. ती म्हणते की, संयोगामुळे माझी ही परिस्थिती झाली आहे, तुम्ही का गुन्हा करत आहात? मी तर माझे फळ भोगत आहे, परंतु तुम्ही सुद्धा का गुन्हा करत आहात? ती काय वेश्या आपणहून झालेली आहे? संयोगांनी बनविले आहे. कोणत्याही जीवमात्रास वाईट होण्याची इच्छा होत च नाही. संयोगच करवितात सर्व आणि नंतर त्याची प्रेक्टिस (सवय) होऊन जाते. सुरूवात संयोग करवितात.
प्रश्नकर्ता : ज्यांना ज्ञान नाही, ते अमूक प्रकारचेच दोष पाहू शकतात?
दादाश्री : ते बस एवढेच, दोषाची माफी मागणे शिका एवढेच संक्षिप्त मध्ये सांगायचे. जो दोष तुम्हाला दिसला, त्या दोषाची माफी मांगायची आणि तो दोष बरोबर आहे असे कधीही नाही बोलायचे नाहीतर तो डबल होणार. चुक केल्या नंतर त्याची क्षमा मागून घ्यावी.