________________
प्रतिक्रमण
दादाश्री : सर्वच निकाली आहे, एकच नाही, सर्वच निकाली आहे. प्रतिक्रमण तर अतिक्रमण केले, म्हणूनच प्रतिक्रमण करायचे, दुसरे नाही, आणि नाही केले तर आपला स्वभाव कधीच बदलणार नाही, तसाचा तसा राहिल ना! तुम्हाला समजले की नाही समजले?
विरोधी सारखे जाहीर नाही झाले तर मग हे मत तुमच्या जवळ राहणार. क्रोध झाला तर आपण क्रोधच्या पक्षात नाही, त्याकरिता प्रतिक्रमण करायचे आहे. नाहीतर क्रोधच्या पक्षात आहोत असे निश्चत होईल. आणि प्रतिक्रमण केले तर आम्ही क्रोधच्या पक्षात नाही आहोत असे जाहीर झाले. अर्थात् त्यातून आपण सुटलो. मुक्त झालो आपण, जबाबदारी कमी झाली. आम्ही त्याचे विरूद्ध आहोत. असे जाहीर करण्यासाठी काही साधन असायला पाहिजे ना? क्रोध आपल्याला काढायचा आहे की ठेवायचा आहे?
प्रश्नकर्ता : ते तर काढायचे आहे.
दादाश्री : जर काढायचे आहे तर प्रतिक्रमण करा. तर मग तुम्ही क्रोधच्या विरोधी आहात भाऊ, नाहीतर क्रोधाशी सहमत आहात, जर प्रतिक्रमण नाही केले तर.
प्रतिक्रमण केव्हा म्हटले जाते, आतून ओझे हलके झाल्या सारखे वाटते, हलके हलके वाटते. पुन्हा ते दोष करतांना त्याला खूप कष्टदाई लागते. आणि हा तर अतिक्रमण करून दोषांचे गुणाकार करत आहे!!
तुम्ही कधी प्रतिक्रमण, खरे प्रतिक्रमण पाहिले, एकतरी दोष कमी झाला असेल असे?
प्रश्नकर्ता : नाही, ते येथेच पहायला मिळाले?
दादाश्री : ज्ञान घेतल्या नंतर आपल्याला आत समज पडते की, दोष झाला आहे हा, तेव्हा प्रतिक्रमण होणार, तो पर्यंत प्रतिक्रमण होणार नाही ना! ज्ञान घेतल्या नंतर त्याची जागृति राहते, अतिक्रमण झाले की लगेच तुम्हाला माहित पडणार, की ही चुक झाली म्हणून लगेचच तुम्ही प्रतिक्रमण करणार. त्याच्या नांवाचे सर्व पद्धतसरचे प्रतिक्रमण होतच राहणार. आणि प्रतिक्रमण झाले म्हणजे धुतले गेले. धुतले गेले म्हणून मग समोरच्याशी डंख