________________
प्रतिक्रमण
प्रश्नकर्ता होणारच नाही?
नसतात.
१३
दादाश्री : नाही, क्रियामध्ये प्रतिक्रमण होतच नाही, प्रतिक्रमण तर भावप्रतिक्रमणचीच जरूर आहे, त्याने काम होणार. क्रिया-प्रतिक्रमण होत
:
हे तर भाव प्रतिक्रमण आहे, क्रिया प्रतिक्रमण तर
समजवा.
प्रश्नकर्ता: द्रव्य प्रतिक्रमण आणि भावप्रतिक्रमण म्हणजे काय थोडे
दादाश्री : भाव असा ठेवायचा की असे नाही व्हायला पाहिजे; हा भावप्रतिक्रमण म्हणायचा आहे. आणि द्रव्यने तर पूर्ण सर्व शब्द - न - शब्द बोलावे लागते. जेवढे शब्द लिहिलेले असतात ना, ते सर्व आपल्याला बोलावे लागतात. त्याला द्रव्य प्रतिक्रमण म्हणतात.
हे प्रतिक्रमण पाहिल्यावर, जर आज भगवान असते तर, या सर्वांना जेलमध्ये टाकले असते. मुर्खा, तू असे केले. प्रतिक्रमण म्हणजे एका गुन्ह्याची माफी मागायची, साफ करून टाकायचे. एक डाग पडला असेल, त्या डागला धुवून साफ करून टाकायचे. ती होती तशीच्या तशी जागा करून टाकायची त्याचे नांव प्रतिक्रमण. आता तर नुसते डागवाले धोतर दिसत आहेत.
हे तर एकाही दोषाचे प्रतिक्रमण केले नाहि आणि पूर्ण दोषांचे भंडार होऊन गेले आहे.
ही नीरूबहेन आहे, तिचे सर्व आचार-विचार कसे उंच झाले आहेत, तेव्हा म्हणे, दरदिवशी पाचशे-पाचशे प्रतिक्रमण करीत होती आणि आता तर म्हणते की आतून बाराशे - बाराशे प्रतिक्रमण होत आहेत. ह्या लोकांनी एक पण केले नाही.
नेहमीच, क्रियेचे आवरण येत असते. आवरण आले म्हणजे चुक झाकली जाते आणि त्यामुळे चुक दिसतच नाही. चुक तर आवरण तुटेल तेव्हाच दिसणार आणि ते आवरण ज्ञानीपुरुषाकडून तुटेल. बाकी स्वत:कडून आवरण तुटणार असे नाही. ज्ञानीपुरुष तर सर्व आवरण फ्रेक्चर करून उडवून टाकतात!