________________
१४
प्रतिक्रमण
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमणला शुद्ध कसे मोजायचे? खरे प्रतिक्रमण कशाप्रकारे होते?
दादाश्री : समकित झाल्यानंतर खरे प्रतिक्रमण होते, सम्यक्त्व झाल्यानंतर, दृष्टी सम्यक् झाल्यानंतर, आत्मदृष्टी झाल्यानंतर खरे प्रतिक्रमण होऊ शकते. पण तोपर्यंत, प्रतिक्रमण केले आणि पस्तावा केला तर त्याच्याने सर्व कमी होऊन जाते. आत्मदृष्टी झालेली नसेल आणि संसारच्या लोकांनी चुक झाल्यानंतर पस्तावा केला आणि प्रतिक्रमण केले त्याच्याने पाप कमी बांधले जाणार, समजले ना? प्रतिक्रमण-पस्तावा केल्याने कर्म नष्ट होतात!
कपड्यावर चहाचा डाग पडल्याबरोबर त्याला लगेच धुवून टाकतात, ते कशासाठी?
प्रश्नकर्ता : डाग जायला पाहिजे तेवढ्यासाठी.
दादाश्री : तसेच आपल्या आत डाग पडले की लगेच धुवून टाकायला पाहिजे. हे लोक लगेच धुवून टाकतात. कुठे कषाय उत्पन्न झाला, काही झाले की त्वरित धुवून टाकले तर साफ चे साफ, सुंदर चे सुंदर ! तुम्ही तर बारा महिन्यात एक दिवस करतात, त्यादिवशी सर्व कपडे बुडवून देतात!
आमचे शूट ऑन साइट प्रतिक्रमण म्हटले जाते. अर्थात् तुम्ही जे करतात त्याला प्रतिक्रमण (खरे) म्हटले जात नाही. कारण की कपडा (दोष) एक पण धुतला जात नाही तुमचा. आणि आमचे तर सर्व धुवून स्वच्छ होऊन गेलेत. प्रतिक्रमण तर त्याला म्हणायचे की कपडे धुवून स्वच्छ होणार.
कपडे दररोज एक-एक करून धुवावे लागते, तेव्हा जैन लोक काय करतात? बारा महिने झाले नंतर बारा महिन्याचे सर्व कपडे एकत्र धुतात ! भगवानच्या येथे असे नाही चालणार. हे लोक बारामहिन्याचे कपडे वाफवतात की नाही? ते तर एक-एक करून धुवायला हवे. दररोज पाचशेपाचशे कपडे (दोष) पूर्ण दिवसभर धुतले, तर काम होणार.
जेवढे दोष दिसतील तेवढे कमी होतील. ह्यांना दररोज चे पाचशे