________________
प्रतिक्रमण
ठेवले आहे. आता ही स्वत:ची गुजराथी भाषा नीट नाही समजत त्याने मागधी भाषेत प्रतिक्रमण केल्याने काय फायदा होणार? आणि साधु-आचार्य पण समजत नाही, त्यांच्यातले पण दोष काही कमी झाले नाहीत. अर्थात् यात परिस्थिती अशी होऊन जाते.
भगवंताने मागधी भाषेत फक्त एक नवकार-मंत्र आहे तेच गावयाचे म्हटले होते. नवकार-मंत्र एकच मागधी भाषेत बोलयाचा, आणि तो पण समजून म्हणायचा. म्हणून मागधीत ठेवण्यासारखा फक्त हा नवकार-मंत्र एकच आहे, कारण की ते भगवंताचे शब्द आहेत. बाकी प्रतिक्रमणमध्ये प्रथम तर त्याचा अर्थ समजायलाच पाहिजे की हा मी प्रतिक्रमण करत आहे ! कोणाचे? कोणी माझा अपमान केला अथवा मी कोणाचा अपमान केला, त्याचे मी प्रतिक्रमण करत आहे.
प्रतिक्रमण म्हणजे *कषायांना समाप्त करून टाकणे.
हे तर वर्षातून एकदा प्रतिक्रमण करणार, तेव्हा नवे कपडे घालून जाणार, तर प्रतिक्रमण हे काय लग्न-समारंभ आहे की काय? प्रतिक्रमण करायचे म्हणजे किती तरी पस्तावा करायचा! तेथे नवीन कपड्याचे काय काम आहे?! तेथे काही लग्न करायचे आहे? पुन्हा *रायशी आणि देवशी. जेव्हा सकाळी काय खाल्ले ते संध्याकाळी आठवत नाही, तर प्रतिक्रमण कशाप्रकारे करणार?
वीतराग धर्म कोणाला म्हटले आहे की त्यात प्रतिदिन पाचशे-पाचशे प्रतिक्रमण करतात. जैनधर्म तर आहे सर्वत्र, पण वीतराग धर्म नाही. बारा महिन्यात एकदा प्रतिक्रमण करणार त्याला जैन कसे म्हणयाचे? तरीसुद्धा संवत्सरी प्रतिक्रमण करा त्याची सुद्धा हरकत नाही.
आम्ही असे बोलतो पण आम्ही बोलण्या पूर्वीच प्रतिक्रमण करून घेतलेले असते. तुम्ही असे बोलायचे नाही. आम्ही असे कडक बोलत असतो, चुक काढत असतो, तरी सुद्धा आम्ही सर्वांना निर्दोषच पहात
*कषाय = क्रोध-मान-माया-लोभ *रायशी = रात्री झालेल्या दोषांचे प्रतिक्रमण, देवशी = दिवसाला झालेल्या दोषांचे प्रतिक्रमण