________________
प्रतिक्रमण
आणि अतिक्रमण झाल्याशिवाय राहात नाही, म्हणून प्रतिक्रमण करा. बाकी सर्व क्रमण तर आहेच. सहजासहज गोष्ट झाली ते क्रमण आहे, त्याची हरकत नाही, पण अतिक्रमण झाल्याशिवाय राहात नाही, म्हणून त्याचे प्रतिक्रमण करा.
प्रश्नकर्ता : हे अतिक्रमण झाले ते स्वत:ला कसे माहित पडेल?
दादाश्री : ते स्वत:ला पण माहित पडते आणि समोरच्याला पण माहित पडते. आपल्याला जाणीव होते की, त्याच्या चेहरावर परिणाम झालेला आहे. आणि तुमच्यावर पण परिणाम होतो. दोघांवर परिणाम होतो. म्हणून त्याचे प्रतिक्रमण करणे अनिवार्य आहे.
__ अतिक्रमण तर, क्रोध-मान-माया-लोभ, हे सर्व अतिक्रमण आहेत. यांचे प्रतिक्रमण केले, म्हणजे क्रोध-मान-माया-लोभ गेले. अतिक्रमण झाले आणि प्रतिक्रमण केले, तर क्रोध-मान-माया-लोभ गेले.
अतिक्रमणने हा संसार उभा झाला आहे, आणि प्रतिक्रमणने नष्ट होत असतो.
प्रश्नकर्ता : तर प्रतिक्रमण म्हणजे काय?
दादाश्री : प्रतिक्रमण म्हणजे समोरचा जो आपला अपमान करत आहे, ते आपण समजून घ्यायला पाहिजे की अपमानाचा गुन्हेगार कोण आहे? अपमान करणारा गुन्हेगार आहे की भोगणारा गुन्हेगार आहे, हे आपणास प्रथम नक्की करायला पाहिजे. तर यात अपमान करणारा हा बिलकूल पण गुन्हेगार नसतो. एक सेंट (प्रतिशत)पण गुन्हेगार नसतो. तो निमित्त असतो. आणि आपल्याच कर्माच्या उदयाधीन तो निमित्त भेटतो. अर्थात् आपलाच गुन्हा आहे. आपल्याला आता त्याच्यासाठी खराबभाव होत आहेत एवढ्यासाठीच प्रतिक्रमण करायला हवे. त्याचे प्रति नालायक आहे, लबाड आहे, असे विचार मनात आले असतील तर, प्रतिक्रमण करायचे. आणि जर असे विचार आले नसतील आणि आपण त्याचे उपकार मानले असेल तर प्रतिक्रमण करायची आवश्यकता नाही. जर आपल्याला कोणी शिवी दिली तर तो आपलाच हिशोब आहे, तो तर निमित्त आहे. खिसा कापला तर तो कापणारा निमित्त आहे आणि