________________
प्रतिक्रमण
प्रश्नकर्ता : हे प्रतिक्रमण कशाप्रकारे करायचे?
दादाश्री : आपण जर ज्ञान घेतले असेल तर त्याचा आत्मा आपणांस माहित होतो. म्हणून आत्माला उद्देशून करायचे, नाहीतर मग भगवंताला उद्देशून करायचे, हे भगवान! पश्चाताप करत आहे, माफी मागत आहे आणि आता पुन्हा असे नाही करणार. बस हे प्रतिक्रमण!
प्रश्नकर्ता : धुतले जाईल खरे हे?
दादाश्री : हो, हो खात्रीने धुतले जाईल!! प्रतिक्रमण केले म्हणून राहात नाही ना?! खूप मोठे कर्म असेल तर जळालेली दोरी सारखे दिसेल पण हात लावल्यावर गळून पडेल.
प्रश्नकर्ता : हा पश्चाताप कशाप्रकारे करायचा? सर्वांच्या देखत करायचे की मनात करायचे?
दादाश्री : मनात, मनात, दादाजींना स्मरण करून की ही माझी चुक झाली आहे, आता पुन्हा नाही करणार-असे मनात स्मरण करून करणे, नंतर पुन्हा, असे करता करता हे सर्व दुःख विसरून जाणार. ही चुक निघून जाते. पण असे नाही केले तर चूकां वाढत जातील.
हा एकच मार्ग असा आहे की स्वत:चे दोष दिसत जातात आणि शूट होत जातात, असे करता करता दोष समाप्त होत जातात.
प्रश्नकर्ता : एकाबाजूने पाप करीत जाणे आणि दुसऱ्याबाजूने पश्चाताप करीत जाणे. असे तर चालतच राहणार.
दादाश्री : असे नाही करायचे, जो मनुष्य पाप करणार आणि जर तो पश्चाताप करणार तर खोटा पश्चाताप करू शकणारच नाही. त्याचा पश्चाताप खराच होणार आणि पश्चाताप खरा आहे म्हणून त्याच्या मागे कांदयाच्या एक पड सारखे एक पड दूर होणार त्यानंतर सुद्धा कांदा आख्खाचा आख्खा दिसतो. नंतर मग दुसरे पड दूर होणार. पश्चाताप कधीपण व्यर्थ जात नाही.
प्रश्नकर्ता : पण खऱ्या मनाने माफी मागायची ना? दादाश्री : माफी मागणारा खऱ्या मनानेच माफी मागत असतो. आणि