________________
'मोक्षाचा मार्ग आहे शूरांचा, नाही कायरांचे काम.' परंतु शूरवीरतेचा उपयोग कुठे करायचा की ज्याच्याने झटक्यात मोक्ष प्राप्ती होईल. भित्रेपणा कश्यास म्हणावे? पापी पुण्यवान होऊ शकतो? तर कशा प्रकारे ?
या आर.डी.एक्स.च्या अग्निमध्ये सर्व जीवन जळत राहिले, त्याला कशाप्रकारे विझवायचे? रात्रं - दिवस पत्निचा प्रताप, मुलें - मुलींचा ताप आणि पैसे कमविण्याचा उत्पात, या सर्व ताण-तणावापासून कशाप्रकारे सुख प्राप्त करुन पोहून पार उतरायचे?
गुरु आणि शिष्य, गुरुमाता आणि शिष्या ह्यांच्यात निरंतर होणाऱ्या कषायांपासून उपदेशक कसे परत फिरु शकतील? विनाहक्काची लक्ष्मी आणि विनाहक्काच्या स्त्रियां प्रति वाणी, वर्तन अथवा मनाने, किंवा दृष्टिने दोष झाले तर तिर्यंच अथवा नर्कगतिच्या व्यतिरिक्त कुठे स्थान होऊ शकते? त्यातून कसे सुटायचे? तिथे सावध रहायचे आहे तर कशाप्रकारे सावध रहायचे आणि सुटायचे? असे अनेक कोड्यात घालणारे, संभ्रमी सनातन प्रश्नांचा उलगडा कसा होऊ शकेल ?
प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनकाळा दरम्यान कधी - कधी संजोगाच्या दबावामुळे अश्या परिस्थितीत फसून जात असतो की संसार व्यवहारमध्ये चुका करायच्या नाहीत तरी सुद्धा तो चुकांपासून मुक्त होऊ शकत नाही; अश्या परिस्थितीमध्ये हृदयापासून खरी माणसे सतत द्विधास्थितित रहात असतात व त्यांना चुकांपासून मुक्त होण्यासाठी आणि जीवन जगण्यासाठी खरा मार्ग सापडतो. ज्यामुळे ते आपल्या आंतरिक सुख-चैन मध्ये राहून प्रगति करू शकता; त्यासाठी कधीही नाही मिळाले असेल असे अध्यात्म विज्ञानाचे एकमेव, अचूक आलोचना-प्रतिक्रमण - प्रत्याख्यानरूपी हत्यार तीर्थंकरांनी, ज्ञानींनी जगाला अर्पण केले आहे, त्या हत्यारच्या सहाय्याने दोषरूपी विकसित विशाल वृक्षला मुख्य मुळासकट निर्मूलन करून अनंत जीव मोक्षलक्ष्मीला प्राप्त करू शकले आहेत, मुक्तिसाठीचे हे प्रतिक्रमणरूपी विज्ञान रहस्याचे फोड यथार्थपणे जसे च्या तसे, प्रकट ज्ञानी पुरुष श्री दादा भगवानांनी केवळज्ञान-स्वरूप मध्ये पाहून बोललेल्या वाणी द्वारा व्यक्त केला आहे, ते सर्व प्रस्तुत ग्रंथमध्ये संकलित केले आहे, जे सुज्ञ वाचकांना
10