Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra

Previous | Next

Page 652
________________ ४६-१४८) महापुराण (६४१ इति तेऽमितमत्युक्तकथावगमतत्पराः । स्वरूपं संसृतेः सम्यक् मुहुर्मुहुरभावयन् ॥ १३९ एवं प्रयाति कालेऽसौ प्रियदत्ता प्रसङ्गतः। यशस्वतोगुणवत्यौ युवाभ्यां केन हेतुना ॥ १४० इयं दीक्षा गृहीतेति पप्रच्छोत्पन्नकौतुका । ते च तत्कारणं स्पष्टं यथावत्तमवोचताम् ॥ १४१ ततो धनवती दीक्षा गणिन्याः सन्निधौ ययौ। माता कुबेरसेना च तयोराथिकयोर्द्वयोः ॥ १४२ तावन्येयुः कपोतौ च ग्रामान्तरमुपाश्रितो। तण्डलाधुपयोगाय समतिप्रचोदितौ ॥ १४३ भवदेवचरेणानुबद्धवैरेण पापिना । दृष्टमात्रोत्थपापेन मारितौ पुरुदंशसा ॥ १४४ तद्राष्ट्रवजयार्षस्य दक्षिणश्रेणिमाश्रिते । गान्धारविषयोशीरवत्याख्यनगरेऽधिपः ॥ १४५ आदित्यगतिरस्यासीन्महादेवी शशिप्रभा । तयोहिरण्यवर्माख्यः सुतो रतिवरोऽभवत् ॥ १४६ तस्मिन्नेवोत्तरश्रेण्यां गौरीविषयविश्रुते । पुरे भोगपुरे वायुरथो विद्याधराधिपः ॥१४७ तस्य स्वयम्प्रभादेव्यां रतिषणा प्रभावती । बभूव जैनधर्माशोऽप्यभ्युद्धरति देहिनः ॥ १४८ याप्रमाणे अमितमति आर्येने सांगितलेली कथा जाणण्यात जे तत्पर झाले होते त्या सर्वानी वारंवार संसाराच्या स्वरूपाचा चांगला विचार केला ।। १३९ ॥ याप्रमाणे काही काल लोटल्यावर एके वेळी प्रियदत्तेने प्रसंग पाहून यशस्वती व गुणवती या दोन आर्यिकाना तुम्ही दीक्षा कोणत्या कारणाने घेतली मला याविषयी कौतुक वाटत आहे असे जेव्हा विचारले तेव्हा त्यानी दीक्षेचे कारण जसे घडले होते ते स्पष्ट करून सांगितले ।। १४०-१४१ ॥ यानन्तर कुबेरमित्राच्या पत्नीने-धनवतीने आर्यिकासंघाची स्वामिनी अशा अमितमती आर्यिकेजवळ दीक्षा धारण केली व त्या दोन आर्यिकांची माता अशा कुबेरसेनेने देखिल आपल्या मुलीजवळ दीक्षा घेतली ।। १४२ ॥ कोणे एके दिवशी यमाने ज्याना प्रेरिले आहे अशी ती दोन कबूतरें तान्दुळ वगैरे खाण्यासाठी दुसऱ्या गावाला गेलीं ॥ १४३ ।।। तेव्हा पूर्वजन्मापासून ज्याच्या ठिकाणी वैर उत्पन्न झाले होते व जो पूर्वजन्मी भवदेव होता व या जन्मी जो मांजर होऊन जन्मला अशा त्या पापी मांजराला त्याना पाहिल्याबरोबर पापाची भावना उत्पन्न झाली व त्याने त्या दोघाना ठार मारले ॥ १४४ ।। त्याच पुष्कलावती देशातील विजयाईपर्वताच्या दक्षिणश्रेणीमध्ये गांधार नामक देशातील उशीरवती नामक नगरात आदित्यगति नांवाचा विद्याधर राजा राज्य करित होता. त्याच्या महादेवीचे-महाराणीचे नांव शशिप्रभा असे होते. या उभयताना तो रतिवर कबूतर हिरण्यवर्म नावाचा मुलगा झाला व याच विजयाध पर्वताच्या उत्तरश्रेणीत गौरीनामक देशात प्रसिद्ध असे भोगपुर नामक नगर होते व तेथे वायुरथ नामक विद्याधरांचा स्वामी-राजा राज्य करीत होता. त्याच्या राणीचे नांव स्वयम्प्रभादेवी असे होते. तिच्या ठिकाणी ही रतिषणा प्रभावती नामक कन्या झाली. बरोबरच आहे की, जैनधर्माचा अंश देखिल प्राण्यांचा उद्धार करतो ॥ १४५-१४८ ॥ म. ८४ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 650 651 652 653 654 655 656 657 658 659 660 661 662 663 664 665 666 667 668 669 670 671 672 673 674 675 676 677 678 679 680 681 682 683 684 685 686 687 688 689 690 691 692 693 694 695 696 697 698 699 700 701 702 703 704 705 706 707 708 709 710 711 712 713 714 715 716 717 718 719 720