________________
१६
पाप-पुण्य
'काही बोलण्यासारखेच नाही. तो त्याच्या स्वतःच्या वाट्याचे पुण्य उपभोगत आहे. यात आम्ही दखल कशा करता करायची?' तेव्हा तो मला म्हणतो की, त्याला समंजस नाही बनवायचे का?' मी म्हटले, जगात जो उपभोगत आहे, तो समंजस म्हटला जातो. आणि जो बाहेर टाकतो तो वेडा म्हटला जातो आणी मेहनत करत राहतो त्याला मजूर म्हटले जाते. परंतु मेहनत करतो त्याला अहंकाराचा रस मिळतो ना! लांब कोट घालून बाहेर जातो तेव्हा लोकं 'शेठजी आले, शेठजी आले' करतात, बस इतकेच आणि भोगणाऱ्याला असे कोणी शेठ-वेठची पडलेली नसते. 'आम्ही तर आमचे भोगले एवढेच खरे.' असे बोलतो.
आत्ताची जी आहे, तिला लक्ष्मी म्हणता येणारच नाही. ही तर पापानुबंधी पुण्याची लक्ष्मी आहे. ते पुण्य असे बांधले होते की अज्ञान तप केले होते, त्याचे पुण्य बांधले गेले. त्याचे फळ आले. फळस्वरुपात लक्ष्मी आली. ही लक्ष्मी लोकांना वेडे बनवते. यास सुख कसे म्हणता येईल? सुख तर, पैशांचा विचारच येत नाही, त्यास सुख म्हणतात. आम्हाला तर वर्षातून एखाद्या वेळेस विचार येतो की खिश्यात पैसे आहेत की नाही?
प्रश्नकर्ता : ओझं वाटते का?
दादाश्री : नाही, ओझं तर आम्हाला वाटतच नाही, पण आम्हाला तो विचारच येत नाही ना! कशासाठी विचार करायचा? पुढे-मागे सर्वकाही तयारच असते. जसे खाण्या-पिण्याचे तुमच्या टेबलावर येते की नाही येत?
भोगणे, रुपयांचे की वेदनीयचे? हे तर ज्याला दगड लागतो, त्याचीच चुक. भोगतो त्याची चुक एवढेच नाही, तर भोगण्याचे बक्षीसही आहे. पापाचे बक्षीस मिळेल तर ते त्याच्या वाईट कर्तव्याचे दंड आणि फुले वाहतील ते त्याच्या चांगल्या कर्तव्याच्या पुण्याचे बक्षीस, पण तरीही दोन्ही भोगणेच आहे, अशाताचे अथवा शाताचे.
निसर्ग काय म्हणतो? त्याने किती रुपये खर्च केले ते आमच्या येथे बघितले जात नाही. वेदनीय काय भोगले? शाता की अशाता, इतकेच